शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

संचारबंदीमुळे माठ विक्रेते अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST

वाशिम : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदीच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू ...

वाशिम : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदीच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, याची झळ माठ विक्रेत्यांना बसत असल्याचे दिसून येते. रांजण, माठ आदी माल हा जागेवरच पडून आहे.

गतवर्षी साधारणत: मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश लागू आहेत. यामुळे लघू व्यावसायिक अडचणीत आल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहेत. कुंभार समाजबांधवांनी बनविलेल्या माठविक्रीचा मुख्य हंगाम हा उन्हाळ्यातील असतो. मार्च, एप्रिल व मे महिन्यात माठाची विक्री केली जाते. साधारणता ऑक्टोबरपासून माठ व रांजन बनविण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. घरगुती माठापासून तर मोठे माठ व पाणपोईचे रांजण बनवीने व मार्च, एप्रिल, मे महिन्यात विक्री करणे हा मुख्य व्यवसाय असतो. गतवर्षीही कडक लॉकडाऊन असल्याने व्यवसायाला फटका बसला. आताही संचारबंदीचे सुधारीत आदेश असल्याने व्यवसायाला फटका बसत आहे. ग्राहकांनी पुन्हा या माठ विक्रेत्यांकडे पाठ फिरवली असल्याने, बनविलेला माल तसाच पडून असल्याचे चित्र वाशिम शहरात पाहावयास मिळत आहे. लागोपाठ दोन हंगाम हातातून गेल्याने उदरनिर्वाह कसा करावा, असा पेच माठ विक्रेत्यांसमोर निर्माण होत आहे.