शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याचे दर आटोक्यात; मात्र विक्री मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:43 IST

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून प्रशासनाने संपूर्ण वाशिम जिल्ह्यात ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे इतर ...

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून प्रशासनाने संपूर्ण वाशिम जिल्ह्यात ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे इतर दुकानांसोबतच फळ विक्रेत्यांचा व्यवसायही ठप्प झालेला आहे. या संकटाचा परिणाम आंब्याचे दर घसरण्यावरही झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, सध्या वाशिमसह जिल्ह्यात हापूस (रत्नागिरी) प्रजातीच्या आंब्याचा दर ५०० ते ९०० रुपये प्रति डझन आहे. मात्र, विक्री मंदावल्याने अधिकांश आंबा सडण्याच्या मार्गावर आहे. यासह हापूस (कर्नाटक)चा दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलो, केशर ८०, पायरी ४० रुपये आणि गावरान आंब्यालाही ४० ते ५० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. दरम्यान, कोरोनामुळे कडक निर्बंध लागू झाल्याने व्यावसायिकांकडून नव्याने आंबा बोलावणे बंद झाल्याने, शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

........................

विक्री ठप्प; आंब्याचे नुकसान

८ मेपर्यंत जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ असे चार तास फळ विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. या काळात वाशिम शहरातील फळ विक्रेत्यांनी भरपूर प्रमाणात आंबा उपलब्ध केला. मात्र, ९ मेपासून कडक निर्बंध लागू होण्यासोबतच फळ विक्रीची दुकानेही बंद आहेत. यामुळे हापूससोबतच अन्य प्रजातींचा आंबाही जागीच सडत असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली.

....................

कोट :

दरवर्षी एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये हापूस, केशर, दशेरी, पायरी, लालबाग, गावरान आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्यानुसार, या वर्षीही विक्री होणारच असे गृहीत धरून ऐन वेळी धावपळ नको, म्हणून आंब्याची साठवणूक करण्यात आली. मात्र, ९ मेपासून कडक निर्बंध लागू झाल्याने आंबा विक्री पूर्णत: ठप्प होऊन नुकसान होत आहे.

- शे. अजीज शे. गफ्फूर

................

दरवर्षीप्रमाणे यंदाही रत्नागिरी हापूसला ग्राहकांकडून विशेष मागणी होती. त्यानुसार, मोठ्या प्रमाणात या आंब्याच्या पेट्या बोलावल्या होत्या. यासह केशर, दशेरी हा आंबाही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. कोरोनामुळे मात्र विक्री मंदावली आहे. कडक निर्बंधाच्या काळातही काही प्रमाणात ग्राहकांकडून ऑर्डर येत आहेत. संबंधितांना आंबा घरपोच पुरविण्याची सोय केली जात आहे.

- शे. नजीर शे. गफ्फूर

...................

कोट :

दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी आंब्याची झाडे फळांनी अधिक प्रमाणात लदबदली आहेत. काही झाडांचा आंबा उतरविण्यात आला आहे. मात्र, कोरोनामुळे व्यापाऱ्यांकडून विशेष मागणी नाही. ग्राहकांकडून मागणी झाल्यास कोरोनाविषयक नियम पाळून संबंधितांना घरपोच आंबा पुरविण्यात येत आहे. मात्र, त्याचे प्रमाणही कमी असल्याने नुकसान होत आहे.

- दत्ता लोनसूने, आंबा उत्पादक

....................

माझ्या शेतात पिकणाऱ्या आंब्याची मी दरवर्षी वाशिमच्या बाजारपेठेत विक्री करतो. काही आंबा अकोला, हिंगोली या जिल्ह्यातही पाठविला जातो. या वर्षी मात्र व्यापाऱ्यांकडून आंब्याला विशेष मागणी नाही. यासह ९ मेपासून कडक निर्बंध लागू झाल्याने बाजारपेठेतही आंबा विक्री करता येणे अशक्य झाले आहे. परिणामी, नुकसान होत आहे.

- शिवाजी बोरकर, आंबा उत्पादक