मानोरा : तालुक्यातील बहुतांश तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय थाटल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना लागणारे विविध कागदपत्रासाठी मानोरा जावे लागते. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांच्या खिशाला झळ बसत आहे.शासनाने सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध सोयी-सवलती मिळाव्यात यासाठी गावपातळीवर विविध विभागाचे पदे निर्माण करून त्या पदावर कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामधूनच तालुक्यातील अनेक गावात तलाठी साजे निर्माण झाले तसेच मंडळ अधिकारी कार्यालय तयार झाले. काही गावात मंडळ अधिकारी यांची इमारत आहे तर तलाठी यांनी सुद्धा आपआपल्या साजात खोली भाडयाने घेवून एक टेबल खुर्ची व आलमारी लावून ठेवली आहे. मात्र तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या साजात हजर न राहता तालुक्याच्या ठिकाणी २-३ तलाठी मिळून कार्यालय थाटून मानोरा येथे राहूनच ग्रामस्थांना लागणारे कागदपत्र देतात.त्यामुळे सामान्य ग्रामस्थांना रहिवासीचा दाखला, नॉनक्रिमिलेअर, जमीन असल्याचा किंवा भूमिहिनाचा दाखला, विद्यार्थ्यांंना उत्पन्नाचा दाखला आवश्यक असल्यास त्यांना मानोरा येथे जावे लागते. ज्या गावचा तलाठी आहे त्या गावातच आठवड्यातून किमान २ दिवस नियमित सेवा द्यावी याकरिता उपविभागीय अधिकार्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी विद्यार्थी व ग्रामस्थ करीत आहे.
तलाठय़ाचा कारभार चालतो मानोरातून
By admin | Updated: September 27, 2014 23:47 IST