शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रस्त्यांवरील खड्डयांमुळे मालेगावकर त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:15 IST

विशेष गंभीर बाब म्हणजे सद्य:स्थितीत खड्डा नाही, असा शहरातील एकही रस्ता शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे काही प्रभागांमधील नागरिकांना आजही कच्चा रस्त्यांवरूनच मार्गक्रमण करावे लागते.आठवडी बाजार ते तहसील रोडलाही ठिकठिकाणी मोठ्या स्वरूपातील खड्डे पडले. पावसाचे पाणी साचत असल्याने विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. 

मालेगाव : शहराला नगरपंचायतचा दर्जा मिळून जवळपास अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. असे असले तरी शहराच्या विकासाने आजही गती धरलेली नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे सद्य:स्थितीत खड्डा नाही, असा शहरातील एकही रस्ता शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाने या रस्त्यांची किमान डागडुजी करण्याची मागणी होत आहे. मालेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १७ मधील सर्वच अंतर्गत रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडले असून काही प्रभागांमधील नागरिकांना आजही कच्चा रस्त्यांवरूनच मार्गक्रमण करावे लागते. सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून कच्चे रस्ते चिखलमय झाल्याने वाहनधारकांसह पादचाºयांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शहरातील मुख्य रस्ता असलेला आठवडी बाजार ते तहसील रोडलाही ठिकठिकाणी मोठ्या स्वरूपातील खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी गांधी चौकातील रस्त्याला डांबरीकरण करण्यात आले. मात्र, सदर रस्ता अल्पावधीतच उखडून परिस्थिती पुर्वीपेक्षाही अधिक गंभीर झाली आहे. नगर पंचायतीने ही बाब गांभीर्याने घेवून पावसाळा असेपर्यंत रस्त्यांची किमान डागडुजी तरी करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव