शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मालेगावात सोमवारी होणार राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 15:00 IST

मालेगाव : विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती तपासण्यासाठी संपूर्ण देशभरातील निवड शाळेतील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी येत्या सोमवारी १३ नोव्हेंबरला होत आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील २६ शाळांचा समावेश आहे. 

ठळक मुद्देतीन वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश बहुपर्यायी प्रश्नपत्रिका

मालेगाव : विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती तपासण्यासाठी संपूर्ण देशभरातील निवड शाळेतील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी येत्या सोमवारी १३ नोव्हेंबरला होत आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील २६ शाळांचा समावेश आहे. 

इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाºया या चाचणीला एनएएस (नॅशनल अचिव्हमेंट सर्वे) या नावानेही ओळखले जात असून, या चाचणीची पूर्वतयारी मालेगावच्या शिक्षण विभागातर्फे केली जात आहे. मालेगावचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे आणि बी.आर. कोहळे व नरेश नाखले यांची नेमणूक करण्यात आली आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांनी किती ‘लर्निंग आऊट कम’ (अध्ययन निष्पत्ती) प्राप्त केले आहे, यासाठी प्रत्येक जिल्हयातील काही निवडक शाळांतील विद्यार्थांची यात पडताळणी केली जाणार आहे. सर्व निवडक शाळांमध्ये एकाच दिवशी अर्थात १३ नोव्हेंबर २०१७ या दिवशी ही चाचणी होणार आहे. हे एकप्रकारे सर्वेक्षण असून, तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक चाचणी होणार आहे. चाचणीतील प्रश्न पर्यायी पद्धतीने राहणार आहेत.

तिसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅक्टिविटी व संवाद पद्धतीद्वारे तर आठवीची चाचणी ही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका वाचून सोडवायची आहे. तिसरी व पाचवीसाठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र या घटकावर आधारित ४५ गुणांचे ४५ प्रश्न राहणार असून, ९० मिनिटाची वेळ आहे. आठवीसाठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र, सामाजिक शास्त्र या घटकावर आधारित ६० गुणांसाठी ६० प्रश्न असून वेळ दोन तासांची राहणार आहे. पर्यवेक्षकांच्या देखरेखखाली परीक्षा होणार असून, शालेय व्यवस्थापन कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट बजावण्यात आले आहे. 

परीक्षा झाल्यावर वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेऊन त्याच दिवशी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जिल्हा कक्षात जमा केल्या जाणार आहेत. प्रत्येक उत्तरपत्रिका ओएमआर पद्धतीने तपासली जाणार असून, यासाठी राज्यावर स्वतंत्र यंत्रणा राहणार आहे.

 संबंधित विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आवश्यक असून, आधार नसेल तर संबंधित विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आधार काढण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. 

सर्वेक्षण समिती शिक्षण विभागातील तज्ज्ञांचा समावेश असून, सर्वेक्षणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व वस्तुस्थिती निदर्शणात येण्याची अपेक्षा शिक्षण विभाग बाळगून आहे. या सर्वेक्षणानुसार शिक्षणाची पुढील दिशाही ठरविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मालेगाव तालुक्यात यावर्षीच्या  सर्वेक्षणासाठी इयत्ता तिसरी व पाचवी व आठवी करीता २६ शाळांतील २३ तुकड्यांची निवड केली आहे.