शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्षांसह पदाधिका-यांचा राजीनामा

By admin | Updated: March 19, 2015 01:34 IST

वाशिम जिल्ह्यातील राजकारणात खळबळ.

वाशिम : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षासह ३0 पदाधिकार्‍यांनी एकाच दिवशी राजीनामा दिल्याने राजकीय वतरुळात खळबळ उडाली आहे. एकाच वेळी एवढय़ा पदाधिकार्‍यांनी राजीनामा देण्याबाबत उलट-सुलट चर्चा होत आहे. वाशिम येथील जिजाऊ सभागृहामध्ये १८ मार्चला मनसेच्यावतीने चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा सादर केला व तो त्यांनी स्वीकृत केला; तसेच जिल्हाध्यक्ष यांनीसुद्धा पदाधिकार्‍यांच्या कारणाशी सहमत होऊन आपला राजीनामा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठविला. स्थानिक जिजाऊ सभागृहामध्ये १८ मार्चला मनसेची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हय़ातील बहुतांश पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी, शाखा प्रमुख व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठक सुरू झाल्यानंतर उपस्थित पदाधिकारी यांनी गत ९ वर्षात पक्षाच्या ध्येयधोरणामध्ये ग्रामीण महाराष्ट्राबाबत विशेष करून विदर्भाच्या सिंचनाबाबत, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, विदर्भाचा सर्वांगीण विकास याबाबत कुठलेही ठोस धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत. पक्ष हा केवळ मोठय़ा शहरांच्या संबंधितच विचार करीत असून, ग्रामीण महाराष्ट्राबाबत अक्षम्य उदासीन असल्याचे बोलून यापुढे पक्षामध्ये काम करण्याची इच्छा नसल्याचे जिल्हाध्यक्षांना सांगितले. जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी सर्व पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून लेखी सुचित करण्याचे सांगितले. उपस्थित पदाधिकारी यांनी लेखी राजीनामा देऊन पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याच्या निवेदनावरून जिल्हाध्यक्ष यांनी सवार्ंचे राजीनामे स्वीकारले. यावेळी राजे यांनी पदाधिकार्‍यांना पक्षात काम करण्याची विनंती केली असता, पदाधिकार्‍यांनी नकार दिला; तसेच पदाधिकारी यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या कारणाचा विचार करता जिल्हाध्यक्ष म्हणून पदाधिकार्‍यांच्या बोलण्यात तथ्य असल्याचे म्हणून जिल्हाध्यक्ष यांनीसुद्धा आपला राजीनामा पाठविला. एकाच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षासह पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिल्याची जिल्हय़ातील राजकारणातील ही पहिली घटना असल्याचे म्हटल्या जात आहे.