शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्षांसह पदाधिका-यांचा राजीनामा

By admin | Updated: March 19, 2015 01:34 IST

वाशिम जिल्ह्यातील राजकारणात खळबळ.

वाशिम : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षासह ३0 पदाधिकार्‍यांनी एकाच दिवशी राजीनामा दिल्याने राजकीय वतरुळात खळबळ उडाली आहे. एकाच वेळी एवढय़ा पदाधिकार्‍यांनी राजीनामा देण्याबाबत उलट-सुलट चर्चा होत आहे. वाशिम येथील जिजाऊ सभागृहामध्ये १८ मार्चला मनसेच्यावतीने चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा सादर केला व तो त्यांनी स्वीकृत केला; तसेच जिल्हाध्यक्ष यांनीसुद्धा पदाधिकार्‍यांच्या कारणाशी सहमत होऊन आपला राजीनामा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठविला. स्थानिक जिजाऊ सभागृहामध्ये १८ मार्चला मनसेची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हय़ातील बहुतांश पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी, शाखा प्रमुख व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठक सुरू झाल्यानंतर उपस्थित पदाधिकारी यांनी गत ९ वर्षात पक्षाच्या ध्येयधोरणामध्ये ग्रामीण महाराष्ट्राबाबत विशेष करून विदर्भाच्या सिंचनाबाबत, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, विदर्भाचा सर्वांगीण विकास याबाबत कुठलेही ठोस धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत. पक्ष हा केवळ मोठय़ा शहरांच्या संबंधितच विचार करीत असून, ग्रामीण महाराष्ट्राबाबत अक्षम्य उदासीन असल्याचे बोलून यापुढे पक्षामध्ये काम करण्याची इच्छा नसल्याचे जिल्हाध्यक्षांना सांगितले. जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी सर्व पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून लेखी सुचित करण्याचे सांगितले. उपस्थित पदाधिकारी यांनी लेखी राजीनामा देऊन पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याच्या निवेदनावरून जिल्हाध्यक्ष यांनी सवार्ंचे राजीनामे स्वीकारले. यावेळी राजे यांनी पदाधिकार्‍यांना पक्षात काम करण्याची विनंती केली असता, पदाधिकार्‍यांनी नकार दिला; तसेच पदाधिकारी यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या कारणाचा विचार करता जिल्हाध्यक्ष म्हणून पदाधिकार्‍यांच्या बोलण्यात तथ्य असल्याचे म्हणून जिल्हाध्यक्ष यांनीसुद्धा आपला राजीनामा पाठविला. एकाच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षासह पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिल्याची जिल्हय़ातील राजकारणातील ही पहिली घटना असल्याचे म्हटल्या जात आहे.