शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

 Maharashtra Election 2019 : वाशिम मतदारसंघात ‘वंचित’चे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 14:12 IST

मुख राजकीय पक्षाच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राजकीय पक्षाच्यावतिने देण्यात आलेल्या उमेदवारीबाबत पक्षातीलच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे उमेदवारांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. राजकीय पक्षातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते वंचितच्या उमेदवारासोबत जुळतांना दिसून येत असल्याने प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.युती, आघाडी झाल्यानंतर बंडखोरी होणार नसल्याचे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात येत होते. परंतु राजकीय पक्षाच्यावतिने उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवार नाखुष झालेत. वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्यावतिने पक्षाशी एकनिष्ठ असलेले, अनेक दिवसांपासून पक्षासाठी रात्रंदिवस झटणारे पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारी मिळविण्याच्या तयारीत होते. निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या काँग्रेसमधील उमेदवारांना आपणापैकी कोणाला तरी उमेदवारी जाहीर होईल असे अपेक्षित असतांना वेळेवर नवख्या उमेदवार रजनी राठोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीवर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शविली. तसेच या संदर्भात बैठकांचे आयोजन केले. काही पदाधिकारी यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. काहींनी पुढे न येता उमेदवारीमध्ये देवाण-घेवाव केल्याचाही आरोप करण्यात आला. काँग्रेसमधील इच्छूकांना उमेदवारी न मिळाल्याने ते एकत्र आलेत व रणनिती आखतांना दिसून येत आहेत. यातील काही जण आज वंचितकडून उमेदवारी देण्यात आलेल्या डॉ. सिध्दार्थ देवळे यांच्यासोबत असल्याची चर्चा होत असल्याने काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेले सिध्दार्थ देवळे यांच्या संपर्कात काँग्रेसचे काही नेते, पदाधिकारी त्यांना उमेदवारी देण्यासाठी संपर्कात होते. परंतु नेमकी काय घडामोड झाली व त्यांना डावलण्यात आलेत. या संधीचा फायदा घेत वंचितच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी जाहीर केली. भाजपा-शिवसेना युती असतांना गत निवडणुकीत व्दितीय क्रमांकावर राहिलेले शिवसेनेचे उमेदवार निलेश पेंढारकर यांनी यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. यामध्ये भाजपाच्या मताचे विभाजन होवून याचा फायदा वंचित आघाडीला होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.काँग्रेसमधील नाखुष पदाधिकारी व कार्यकर्ते, भाजपा व शिवसेनेचे अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांमुळे होणारी मताची विभागणी कोणाच्या पथ्यावर पडते यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगतांना दिसून येत आहेत.चौरंगी लढतीचे चित्रवाशिम विधानसभा गत २०१४ च्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली होती. तिरंगी लढतीमध्ये प्रमुख पक्षाच्या तीनही उमेदवारांमध्ये ४ ते ५ हजाराचा फरक होता. यावेळी वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. गत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना व काँग्रेस उमेदवारांमध्ये लढत झाली होती. यामध्ये भाजपाच्या उमेदवाराला ४८१९६, शिवसेनेच्या उमेदवाराला ४३८०३ तर काँग्रेसच्या उमेदवाराला ३५९६८ मते मिळाली होती. यावेळीही या पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. फक्त शिवसेना पक्षावर गत निवडणुकीत असलेले उमेदवार हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. यावेळी वंचित आघाडीने निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने चौरंगी लढतीचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :washim-acवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019