शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बंधाऱ्याच्या अपूर्ण कामामुळे शेतीचे सात लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:27 IST

मंगरूळपीर : जलसंधारण विभागाने बंधाऱ्याचे काम अपूर्ण ठेवल्याने पावसाचे पाणी शेतात घुसून शेतजमीन खरडून गेल्यामुळे सात लाख रुपयांचे नुकसान ...

मंगरूळपीर : जलसंधारण विभागाने बंधाऱ्याचे काम अपूर्ण ठेवल्याने पावसाचे पाणी शेतात घुसून शेतजमीन खरडून गेल्यामुळे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार तालुक्यातील गणेशपूर येथील शेतकरी शंकर खोडके यांनी उपविभागीय अधिकारी व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

गणेशपूर येथील गट नं. ४ / ३ मधील शेती क्षेत्र २ हे. ४० आर शेतजमीन अर्जदाराचे वहितीत व ताब्यात आहे. या जमिनीत मागील वर्षी एप्रिल - मे २०२१ मध्ये जल संधारण विभाग मंगरूळपीरमार्फत बांध करण्याचे काम सुरू आहे. हे काम संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून बंधारा व्यवस्थित केला नाही. बंधाऱ्यामध्ये आज रोजीसुद्धा भरपूर माती असून संपूर्ण शेतात गिट्टी, डस्ट पडलेली आहे. १० जून २०२१ रोजी रात्री व १२ जून २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सदरहू बंधारा पूर्णपणे न बांधल्यामुळे संपूर्ण पावसाचे पाणी माझ्या शेतातून वाहिले आहे. त्यामुळे माझी संपूर्ण जमीन खरडून गेली असून पेरणीयोग्य राहिलेली नाही. त्यामुळे मला या वर्षीच्या पेरणीच्या हंगामात पेरणी करता येत नाही. माझे अतोनात आर्थिक नुकसान झाले असून, त्यामुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. आज रोजी शेतात पावसाच्या पाण्याने तळे साचलेले आहे. जल संधारण विभागाने पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याचे काम पूर्ण केले नाही व बंधाऱ्यामधील माती व गाळ व्यवस्थित उपसला नाही. पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता व्यवस्था केली नाही व बंधाऱ्याच्या बांधकामाकरिता आणलेली गिट्टी व डस्ट पावसाळ्यापूर्वी उचलून नेली नाही व ती शेतातच पडू दिली. दिनांक १० व १२ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे माझ्या शेतातच पाणी साचून वाट मिळेल तिकडे फुटले व त्यामध्ये माझी संपूर्ण शेतजमीन खरडून गेली. ती जमीन पेरण्यायोग्य राहिलेली नाही व जल संधारण विभागाने बंधारा बांधकामासाठी आलेली गिट्टी व डस्ट आज रोजीसुद्धा शेतातच पडलेली आहे. माझ्या संपूर्ण शेतात तळे साचून पाणी साचले असल्यामुळे मी शेतात पेरणी करू शकत नाही. त्यामुळे माझे अंदाजे सात लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. याची आपल्या विभागामार्फत पाहणी व चौकशी करून माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी; अन्यथा माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येईल व मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे तक्रारीत नमूद आहे.