शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

बंधाऱ्याच्या अपूर्ण कामामुळे शेतीचे सात लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:27 IST

मंगरूळपीर : जलसंधारण विभागाने बंधाऱ्याचे काम अपूर्ण ठेवल्याने पावसाचे पाणी शेतात घुसून शेतजमीन खरडून गेल्यामुळे सात लाख रुपयांचे नुकसान ...

मंगरूळपीर : जलसंधारण विभागाने बंधाऱ्याचे काम अपूर्ण ठेवल्याने पावसाचे पाणी शेतात घुसून शेतजमीन खरडून गेल्यामुळे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार तालुक्यातील गणेशपूर येथील शेतकरी शंकर खोडके यांनी उपविभागीय अधिकारी व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

गणेशपूर येथील गट नं. ४ / ३ मधील शेती क्षेत्र २ हे. ४० आर शेतजमीन अर्जदाराचे वहितीत व ताब्यात आहे. या जमिनीत मागील वर्षी एप्रिल - मे २०२१ मध्ये जल संधारण विभाग मंगरूळपीरमार्फत बांध करण्याचे काम सुरू आहे. हे काम संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून बंधारा व्यवस्थित केला नाही. बंधाऱ्यामध्ये आज रोजीसुद्धा भरपूर माती असून संपूर्ण शेतात गिट्टी, डस्ट पडलेली आहे. १० जून २०२१ रोजी रात्री व १२ जून २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सदरहू बंधारा पूर्णपणे न बांधल्यामुळे संपूर्ण पावसाचे पाणी माझ्या शेतातून वाहिले आहे. त्यामुळे माझी संपूर्ण जमीन खरडून गेली असून पेरणीयोग्य राहिलेली नाही. त्यामुळे मला या वर्षीच्या पेरणीच्या हंगामात पेरणी करता येत नाही. माझे अतोनात आर्थिक नुकसान झाले असून, त्यामुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. आज रोजी शेतात पावसाच्या पाण्याने तळे साचलेले आहे. जल संधारण विभागाने पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याचे काम पूर्ण केले नाही व बंधाऱ्यामधील माती व गाळ व्यवस्थित उपसला नाही. पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता व्यवस्था केली नाही व बंधाऱ्याच्या बांधकामाकरिता आणलेली गिट्टी व डस्ट पावसाळ्यापूर्वी उचलून नेली नाही व ती शेतातच पडू दिली. दिनांक १० व १२ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे माझ्या शेतातच पाणी साचून वाट मिळेल तिकडे फुटले व त्यामध्ये माझी संपूर्ण शेतजमीन खरडून गेली. ती जमीन पेरण्यायोग्य राहिलेली नाही व जल संधारण विभागाने बंधारा बांधकामासाठी आलेली गिट्टी व डस्ट आज रोजीसुद्धा शेतातच पडलेली आहे. माझ्या संपूर्ण शेतात तळे साचून पाणी साचले असल्यामुळे मी शेतात पेरणी करू शकत नाही. त्यामुळे माझे अंदाजे सात लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. याची आपल्या विभागामार्फत पाहणी व चौकशी करून माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी; अन्यथा माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येईल व मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे तक्रारीत नमूद आहे.