शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्य साठवणुकीवर मर्यादा; व्यापारी आक्रमक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा भाव दुप्पट करण्याचे स्वप्न केंद्र सरकारने दाखविले आहे. सद्य:स्थितीत सर्व डाळवर्गीय शेतमालाचे बाजारभाव हे किमान आधारभूत ...

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा भाव दुप्पट करण्याचे स्वप्न केंद्र सरकारने दाखविले आहे. सद्य:स्थितीत सर्व डाळवर्गीय शेतमालाचे बाजारभाव हे किमान आधारभूत किमतीच्या आसपास आहेत तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत डाळवर्गीय शेतमालाच्या स्टॉकवर बंदी लावल्यामुळे बाजारभाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे डाळवर्गीय शेतमालाचे भाव व्यापाऱ्यांनीच पाडले असा शेतकऱ्यांचा गैरसमज होत आहे. या अध्यादेशामुळे संपूर्ण व्यापारीवर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारीसुद्धा डाळवर्गीय शेतमालाची खरेदी करण्यास घाबरत असल्याचे निवेदनात नमूद आहे. कडधान्य साठवणुकीवर मर्यादा आणणारा अध्यादेश केंद्र सरकारने रद्द करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे केली. यावेळी आनंद चरखा, ओमप्रकाश बंग, सुरेस पाटील भोयर, गोपाल कबरा, पुरुषोतम तोष्णिवाल, योगेश मुंदडा, मनीष साबू, राजकुमार राठी, जगदीश हुरकट यांच्यासह व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.

००००

नवीन अध्यादेशामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता !

एकीकडे केंद्र शासन कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे कडधान्य साठवणुकीवर मर्यादा आणणारा अध्यादेश काढणे ही बाब या परिस्थितीच्या विपरीत आहे, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला. केंद्र शासनाकडून शेतमालासंबंधित वारंवार नवीन अध्यादेश निघत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.