शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

कडधान्य साठवणुकीवर मर्यादा; व्यापारी आक्रमक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा भाव दुप्पट करण्याचे स्वप्न केंद्र सरकारने दाखविले आहे. सद्य:स्थितीत सर्व डाळवर्गीय शेतमालाचे बाजारभाव हे किमान आधारभूत ...

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा भाव दुप्पट करण्याचे स्वप्न केंद्र सरकारने दाखविले आहे. सद्य:स्थितीत सर्व डाळवर्गीय शेतमालाचे बाजारभाव हे किमान आधारभूत किमतीच्या आसपास आहेत तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत डाळवर्गीय शेतमालाच्या स्टॉकवर बंदी लावल्यामुळे बाजारभाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे डाळवर्गीय शेतमालाचे भाव व्यापाऱ्यांनीच पाडले असा शेतकऱ्यांचा गैरसमज होत आहे. या अध्यादेशामुळे संपूर्ण व्यापारीवर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारीसुद्धा डाळवर्गीय शेतमालाची खरेदी करण्यास घाबरत असल्याचे निवेदनात नमूद आहे. कडधान्य साठवणुकीवर मर्यादा आणणारा अध्यादेश केंद्र सरकारने रद्द करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे केली. यावेळी आनंद चरखा, ओमप्रकाश बंग, सुरेस पाटील भोयर, गोपाल कबरा, पुरुषोतम तोष्णिवाल, योगेश मुंदडा, मनीष साबू, राजकुमार राठी, जगदीश हुरकट यांच्यासह व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.

००००

नवीन अध्यादेशामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता !

एकीकडे केंद्र शासन कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे कडधान्य साठवणुकीवर मर्यादा आणणारा अध्यादेश काढणे ही बाब या परिस्थितीच्या विपरीत आहे, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला. केंद्र शासनाकडून शेतमालासंबंधित वारंवार नवीन अध्यादेश निघत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.