शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

त्याग वृत्तीमुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी -मुनीश्री श्री पद्मदर्शन विजयजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 15:55 IST

प्रत्येकाने त्याग वृत्ती ठेवली पाहिजे, त्याग वृत्ती ठेवल्यामुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी राहते, असा उपदेश पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी प्रवचनादरम्यान शिरपुर येथे उपस्थित भाविकांना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपुर जैन (वाशिम) : गरजु गोरगरीबांची सेवा करुन त्यांना नेहमी मदत केली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या व गरजवंतांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरवुन त्यांची सेवा करणे हा खरा धर्म आहे. प्रत्येकाने त्याग वृत्ती ठेवली पाहिजे, त्याग वृत्ती ठेवल्यामुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी राहते, असा उपदेश पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी प्रवचनादरम्यान शिरपुर येथे उपस्थित भाविकांना दिला.शिरपूर येथील पारसबाग येथे दिव्यप्रभावी श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्यावतीने आयोजित चातुर्मासनिमित्त वाराणसी नगरीत ऐतिहासिक ५० दिवसीय चातुर्मास आराधना सुरू आहे. या धार्मिक सोहळयात मोठ्या संख्येत विविध राज्यातून ७०० भाविकांनी सहभाग घेतला आहे. याप्रसंगी पन्यास प्रवर श्री पद्मदर्शन विजयजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून ज्ञानगंगा वाहत आहे. यावेळी मुनिश्रींनी आपल्या उपदेशात त्यागवाद श्रेष्ठ आहे असे म्हटले. त्याग नसेल तर जीवनात अर्थ नाही. त्याग नसणाऱ्याचे जीवन पशुतुल्य असते. जीवनात अनेकदा अशा घटना घडतात की त्यावेळी मनुष्याला काय करावे व काय करु नये, अशी परिस्थीती निर्माण होते. जीवन एक संग्राम भूमि सारखे आहे. जीवनाच्या या संग्राम भूमिवर आपल्याला यशस्वी व्हावयाचे असल्यास त्यागाच्या मार्गावर चालने शिका. लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी, भगवान महावीर, प्रभु रामचंद्र, युधीष्ठीर आदींच्या जीवनाचा आदर्श अंगिकारल्यास निश्चितच दुस-यांसाठी आपले जीवन प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी सांगितले. आपल्या प्रवचनातून पुढे बोलताना मुनीश्री पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी आपल्या जवळ जास्त असणारे धन, सामान हे गरजवंत व गरिबांना द्या, त्यांना मदत करा, मंदिर, धर्मस्थान, धार्मिक स्थळ ठिकाण आदी ठिकाणी दानधर्र्म करण्याऐवजी जर आपण दीनदु:खी गोरगरीबांना सहाय्यता केली तर ते मोठे धर्म व पुण्याचे काम राहणार आहे. कारण दुस-याच्या प्रति सहानुभुती व मदतीची भावना ठेवणे हाच खरा मानव धर्म आहे, असे विजयजी महाराज म्हणाले. कार्यक्रमाला भाविकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र