शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

त्याग वृत्तीमुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी -मुनीश्री श्री पद्मदर्शन विजयजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 15:55 IST

प्रत्येकाने त्याग वृत्ती ठेवली पाहिजे, त्याग वृत्ती ठेवल्यामुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी राहते, असा उपदेश पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी प्रवचनादरम्यान शिरपुर येथे उपस्थित भाविकांना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपुर जैन (वाशिम) : गरजु गोरगरीबांची सेवा करुन त्यांना नेहमी मदत केली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या व गरजवंतांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरवुन त्यांची सेवा करणे हा खरा धर्म आहे. प्रत्येकाने त्याग वृत्ती ठेवली पाहिजे, त्याग वृत्ती ठेवल्यामुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी राहते, असा उपदेश पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी प्रवचनादरम्यान शिरपुर येथे उपस्थित भाविकांना दिला.शिरपूर येथील पारसबाग येथे दिव्यप्रभावी श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्यावतीने आयोजित चातुर्मासनिमित्त वाराणसी नगरीत ऐतिहासिक ५० दिवसीय चातुर्मास आराधना सुरू आहे. या धार्मिक सोहळयात मोठ्या संख्येत विविध राज्यातून ७०० भाविकांनी सहभाग घेतला आहे. याप्रसंगी पन्यास प्रवर श्री पद्मदर्शन विजयजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून ज्ञानगंगा वाहत आहे. यावेळी मुनिश्रींनी आपल्या उपदेशात त्यागवाद श्रेष्ठ आहे असे म्हटले. त्याग नसेल तर जीवनात अर्थ नाही. त्याग नसणाऱ्याचे जीवन पशुतुल्य असते. जीवनात अनेकदा अशा घटना घडतात की त्यावेळी मनुष्याला काय करावे व काय करु नये, अशी परिस्थीती निर्माण होते. जीवन एक संग्राम भूमि सारखे आहे. जीवनाच्या या संग्राम भूमिवर आपल्याला यशस्वी व्हावयाचे असल्यास त्यागाच्या मार्गावर चालने शिका. लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी, भगवान महावीर, प्रभु रामचंद्र, युधीष्ठीर आदींच्या जीवनाचा आदर्श अंगिकारल्यास निश्चितच दुस-यांसाठी आपले जीवन प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी सांगितले. आपल्या प्रवचनातून पुढे बोलताना मुनीश्री पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी आपल्या जवळ जास्त असणारे धन, सामान हे गरजवंत व गरिबांना द्या, त्यांना मदत करा, मंदिर, धर्मस्थान, धार्मिक स्थळ ठिकाण आदी ठिकाणी दानधर्र्म करण्याऐवजी जर आपण दीनदु:खी गोरगरीबांना सहाय्यता केली तर ते मोठे धर्म व पुण्याचे काम राहणार आहे. कारण दुस-याच्या प्रति सहानुभुती व मदतीची भावना ठेवणे हाच खरा मानव धर्म आहे, असे विजयजी महाराज म्हणाले. कार्यक्रमाला भाविकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र