शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

वाशिम जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ; १५ दिवसांत कापसाचे बोंडही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 14:53 IST

वाशिम: यंदाच्या हंगामात शेतकºयांकडून शासकीय दरात कापसाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात ३ ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले; परंतु २५ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या खरेदी केंद्रांवर अद्याप कापसाचे एकही बोंडाची खरेदी होऊ शकली नाही.

ठळक मुद्दे जिल्ह्यात ३ ठिकाणी खरेदी केंद्र सुरु अद्याप किलोभरही कापसाची खरेदी होऊ शकली नाही

वाशिम: यंदाच्या हंगामात शेतकºयांकडून शासकीय दरात कापसाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात ३ ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले; परंतु २५ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या खरेदी केंद्रांवर अद्याप कापसाचे एकही बोंडाची खरेदी होऊ शकली नाही. खाजगी व्यापाºयांकडून शासनाच्या हमीदरापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकºयांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ केल्याचे स्पष्ट होत आहे. 

यंदा जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. सुरुवातीला पावसाचे अल्प प्रमाण आणि किडींचा प्रादूर्भाव वगळता कपाशीला नंतर परतीच्या पावसाची चांगली साथ मिळाल्यानंतर जिल्ह्यात कपाशीचे उत्पादन बºयापैकी झाले. आता कपाशीचा पहिला वेचा पूर्ण झाला असून, खाजगी व्यापाºयांनी गत महिन्याच्या दुसºया आठवड्यापासूनच कपाशीची खरेदीही सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी कपाशीची विक्री करण्यासाठी येत आहेत. शासनाकडूनही यंदा २५ आॅक्टोबरपासून शासकीय खरेदी केंद्र उघडण्यात आली. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा येथील केंद्रांचा समावेश आहे. आता या खरेदी केंद्रांवर शेतकºयांकडून शासनाकडून जाहीर हमीदरानुसार कपाशीची खरेदी करण्यात येणार आहे; परंतु खाजगी व्यापाºयांकडून शासकीय दरापेक्षा अधिक दराने कपाशीची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरी व्यापाºयांकडेच धाव घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर अद्याप किलोभरही कापसाची खरेदी होऊ शकली नाही. शासनाकडून जाहीर करण्यात आलेले अल्प हमीदर त्यास कारणीभूत असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी