शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नेतेमंडळींनो पुढे या, वाशिमवरील ‘आकांक्षित’चा डाग पुसून काढा - नितीन गडकरी

By सुनील काकडे | Updated: September 29, 2023 14:30 IST

शहरातील पाटणी कमर्शियल काॅम्प्लेक्सच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रीय महामार्ग राष्टार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

- सुनील काकडे

वाशिम : जिल्ह्याच्या निर्मितीला प्रदिर्घ कालावधी उलटला आहे; मात्र विकासाच्या बाबतीत हा जिल्हा आजही प्रचंड माघारलेला आहे. शेतकरी आत्महत्यांचे वाढलेले प्रमाण, कायम असलेली बेरोजगारी, शिक्षण, कृषी, आरोग्य यासह ४७ पॅरामिटर्समध्ये जिल्ह्याची पिछेहाट झालेली आहे. सर्वपक्षीय नेतेमंडळींनी वाशिमवरील ‘आकांक्षित’चा डाग पुसून काढण्यासाठी पुढे यायला हवे. हा जिल्हा प्रगतिशिल आणि सर्वच क्षेत्रात समृद्ध बनविण्यासाठी प्रयत्न करावे. माझी या कामात खंबीरपणे साथ राहील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी केले.

शहरातील पाटणी कमर्शियल काॅम्प्लेक्सच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रीय महामार्ग राष्टार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार वसंतराव खंडेलवाल, राजेंद्र पाटणी, लखन मलिक, अमीत झनक, तान्हाजी मुटकूळे, माजी आमदार विजयराव जाधव, माजी खासदार अनंतराव देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष श्याम बढे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय खानझोडे, नरेंद्र गोलेच्छा, पुरूषोत्तम राजगुरू, जिल्हाधिकारी बुवनेश्वरील एस. यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी प्रामुख्याने कृषी, उद्योग, शिक्षण या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याच्या विकासावर संभाषण केले. ते म्हणाले, मी मंत्री बनण्यापूर्वी वाशिम जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. आज मात्र २२८ किलोमिटरचा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यात तयार झाला आहे. यासह विविध स्वरूपातील विकासकामांसाठी शासनाने आतापर्यंत ६,५२७ कोटी रुपये दिले असून ५,७८० कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली; तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. सरकारला १० वर्षे पूर्ण होण्याआधी जिल्ह्यात १०,००० कोटींची कामे झालेली असतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

वाशिम हा ‘आकांक्षित’ जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असल्याची बाब अत्यंत दुर्दैवी आहे. हा डाग पुसून काढण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी उन्नत होणे आवश्यक आहे. उद्योगधंदे सुरू होवून बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. याशिवाय प्रत्येकास दर्जेदार शिक्षण मिळण्याची पुरेशी सुविधा निर्माण व्हायला हवी. त्याकरिता हेवेदावे बाजूला सारून सर्वपक्षीय नेतेमंडळींनी कामाला लागणे गरजेचे आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली.

वाशिमात लॉजिस्टीक पार्क उभे करूऔद्योगिकदृष्ट्या जिल्ह्याची पूर्णत: पिछेहाट झालेली आहे. त्यामुळेच बेरोजगारी वाढली असून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेनाशी झाली आहे. तथापि, देशभरात २ लाख कोटींचे लॉजिस्टीक पार्क उभारले जात असून वाशिममध्येही रेल्वे स्थानक परिसरात विनावापर पडून असलेल्या ५० एकर जमिनीवर असे पार्क उभारण्याची आपली तयारी आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. तसेच सर्वपक्षीय नेतेमंडळींनी त्यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

शेतकरी समृद्ध झाला तरच उद्योगधंदे टिकतीलवाशिम जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत ४६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या समस्या दूर व्हायला हव्या. शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला, तो समृद्ध झाला तरच उद्योगधंदे टिकू शकतील, असे गडकरी म्हणाले.

खारपाणपट्ट्यात झिंगेपालन करा; एकरी ३० लाख रुपये कमवाविदर्भातील अकोला, बुलढाणासह काही जिल्ह्यांमध्ये खारपाणपट्टा वसलेला आहे. या पाण्यात शेतीपिके तग धरू शकत नाहीत; मात्र झिंगेपालनाचा व्यवसाय निश्चितपणे यशस्वी ठरू शकतो. राजस्थानात खाऱ्या पाण्यात झिंगेपालनातून एकरी ३० लाख रुपये उत्पन्न काढले जात आहे. तसाच प्रयोग येथील शेतकऱ्यांनीही करायला हवा. त्यासाठी खाऱ्या पाण्याचे तलाव तयार करू, असे मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करूरिसोड तालुक्यातील मसलापेन येथे असलेला बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंबंधी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी यावेळी मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले. त्याची दखल घेत गडकरींनी साखर कारखाना सुरू करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. तसेच आमदार लखन मलिक यांनी मांडलेली शेलूबाजार बायपासचे काम पूर्ण करण्याची मागणीही तत्काळ मंजूर केली. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीwashimवाशिम