शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

नेतेमंडळींनो पुढे या, वाशिमवरील ‘आकांक्षित’चा डाग पुसून काढा - नितीन गडकरी

By सुनील काकडे | Updated: September 29, 2023 14:30 IST

शहरातील पाटणी कमर्शियल काॅम्प्लेक्सच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रीय महामार्ग राष्टार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

- सुनील काकडे

वाशिम : जिल्ह्याच्या निर्मितीला प्रदिर्घ कालावधी उलटला आहे; मात्र विकासाच्या बाबतीत हा जिल्हा आजही प्रचंड माघारलेला आहे. शेतकरी आत्महत्यांचे वाढलेले प्रमाण, कायम असलेली बेरोजगारी, शिक्षण, कृषी, आरोग्य यासह ४७ पॅरामिटर्समध्ये जिल्ह्याची पिछेहाट झालेली आहे. सर्वपक्षीय नेतेमंडळींनी वाशिमवरील ‘आकांक्षित’चा डाग पुसून काढण्यासाठी पुढे यायला हवे. हा जिल्हा प्रगतिशिल आणि सर्वच क्षेत्रात समृद्ध बनविण्यासाठी प्रयत्न करावे. माझी या कामात खंबीरपणे साथ राहील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी केले.

शहरातील पाटणी कमर्शियल काॅम्प्लेक्सच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रीय महामार्ग राष्टार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार वसंतराव खंडेलवाल, राजेंद्र पाटणी, लखन मलिक, अमीत झनक, तान्हाजी मुटकूळे, माजी आमदार विजयराव जाधव, माजी खासदार अनंतराव देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष श्याम बढे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय खानझोडे, नरेंद्र गोलेच्छा, पुरूषोत्तम राजगुरू, जिल्हाधिकारी बुवनेश्वरील एस. यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी प्रामुख्याने कृषी, उद्योग, शिक्षण या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याच्या विकासावर संभाषण केले. ते म्हणाले, मी मंत्री बनण्यापूर्वी वाशिम जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. आज मात्र २२८ किलोमिटरचा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यात तयार झाला आहे. यासह विविध स्वरूपातील विकासकामांसाठी शासनाने आतापर्यंत ६,५२७ कोटी रुपये दिले असून ५,७८० कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली; तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. सरकारला १० वर्षे पूर्ण होण्याआधी जिल्ह्यात १०,००० कोटींची कामे झालेली असतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

वाशिम हा ‘आकांक्षित’ जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असल्याची बाब अत्यंत दुर्दैवी आहे. हा डाग पुसून काढण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी उन्नत होणे आवश्यक आहे. उद्योगधंदे सुरू होवून बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. याशिवाय प्रत्येकास दर्जेदार शिक्षण मिळण्याची पुरेशी सुविधा निर्माण व्हायला हवी. त्याकरिता हेवेदावे बाजूला सारून सर्वपक्षीय नेतेमंडळींनी कामाला लागणे गरजेचे आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली.

वाशिमात लॉजिस्टीक पार्क उभे करूऔद्योगिकदृष्ट्या जिल्ह्याची पूर्णत: पिछेहाट झालेली आहे. त्यामुळेच बेरोजगारी वाढली असून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेनाशी झाली आहे. तथापि, देशभरात २ लाख कोटींचे लॉजिस्टीक पार्क उभारले जात असून वाशिममध्येही रेल्वे स्थानक परिसरात विनावापर पडून असलेल्या ५० एकर जमिनीवर असे पार्क उभारण्याची आपली तयारी आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. तसेच सर्वपक्षीय नेतेमंडळींनी त्यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

शेतकरी समृद्ध झाला तरच उद्योगधंदे टिकतीलवाशिम जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत ४६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या समस्या दूर व्हायला हव्या. शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला, तो समृद्ध झाला तरच उद्योगधंदे टिकू शकतील, असे गडकरी म्हणाले.

खारपाणपट्ट्यात झिंगेपालन करा; एकरी ३० लाख रुपये कमवाविदर्भातील अकोला, बुलढाणासह काही जिल्ह्यांमध्ये खारपाणपट्टा वसलेला आहे. या पाण्यात शेतीपिके तग धरू शकत नाहीत; मात्र झिंगेपालनाचा व्यवसाय निश्चितपणे यशस्वी ठरू शकतो. राजस्थानात खाऱ्या पाण्यात झिंगेपालनातून एकरी ३० लाख रुपये उत्पन्न काढले जात आहे. तसाच प्रयोग येथील शेतकऱ्यांनीही करायला हवा. त्यासाठी खाऱ्या पाण्याचे तलाव तयार करू, असे मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करूरिसोड तालुक्यातील मसलापेन येथे असलेला बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंबंधी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी यावेळी मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले. त्याची दखल घेत गडकरींनी साखर कारखाना सुरू करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. तसेच आमदार लखन मलिक यांनी मांडलेली शेलूबाजार बायपासचे काम पूर्ण करण्याची मागणीही तत्काळ मंजूर केली. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीwashimवाशिम