शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

.. अखेर शेतक-यांना सहा तास नियमित वीज पुरवठा

By admin | Updated: November 9, 2014 01:09 IST

शेतक-यांच्या आंदोलनापुढे अधिकारी नमले

कार्ली (वाशिम): किन्हीराजा ३३ के व्ही विद्युत उपकेंद्रावरुन अनियमित कमी दाबाच्या व आठवड्यातून ३ दिवस ६ तास वीज पुरवठा करणार्‍या महावितरण विरोधात परिसरातील शेतकर्‍यांनी आज औरंगाबाद - नागपूर हायवेवर रास्ता रोकोचा प्रयत्न केला; मात्र पोलिस प्रशासन व महावितरणने यशस्वी मध्यस्थी करुन दररोज सहा तास वीज पुरवठा करण्याचे मान्य करुन शेतकर्‍यांचा संताप शांत केला. किन्हीराजा उपकेंद्रावरील एरंडा फिडर अंतर्गत कार्ली, किनखेडा, दुबळवेल, गुंज, तोरनाळा, जोडगव्हाण, पांगरी धनकुटे आदी गावांना मागील कित्येक महिन्यांपासून वरील उपकेंद्रावरुन आठवड्यातून केवळ दोन ते तीन दिवस तोही कमी दाबाच्या अनियमित ६ तासाचा विद्युत पुरवठा होत असल्याने या भागातील बळीराजासह सर्वसामान्य नागरिक जेरीस आला आहे. खरिपाचे पीक हातचे गेले आहे. उरल्यासुरल्या आशा रब्बीवर असताना पाणी असूनही केवळ विजेअभावी रब्बीचा पेरा धोक्यात आला. याबाबतची कैफीयत जिल्हाधिकारी, जिल्हा कार्यकारी अभियंता यांनाही दिली होती व यावर विचार न झाल्यास १ तारखेला रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला होता; मात्र लालफीतशाहीत अडकलेल्या दप्तर दिरंगाईसाठी माहीर असलेल्या अधिकार्‍यांनी यावर काही एक ठोस पाऊल न उचलल्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांनी औरंगाबाद - नागपूर हायवेवर चक्काजाम आंदोलनाचे पाऊल उचलले. त्या आंदोलनानंतर महावितरणने ५ नोव्हेंबर पासून सुरळीत ८ तास वीज पुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले; मात्र या आश्‍वासनाला महावितरण न जागल्याने परिसरातील शेकडो शेतकरी महावितरणच्या किन्हीराजा कार्यालयावर धडकले व पुन्हा चक्काजामचा इशारा प्रभाकर लांडकर यांच्या नेतृत्वात दिला. सोबतच आमच्या मागण्या मान्य न करणार्‍या अधिकार्‍यांना बांगडी भरण्याचा दमही दिला. यावेळी महावितरणच्यावतीने कनिष्ठ अभियंता पवार, ऑपरेटर हाके, लाईनमन निलेश गोंडाळ यांनी आपबिती समजून घेतली. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी जउळका पो.स्टेशनचे ठाणेदार किरणकुमार सावळे, पीएसआय आरसेवार कैलास राठोड व स्टेशनचा पुनर्ताफा घटनास्थळी हजर होता.