शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शनिवार शेवटचा दिवस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:41 IST

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

ठळक मुद्देएकवेळ समझोता योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी ३० जून २०१८ पर्यंत  आहे. शेतकऱ्यांनी अद्याप आपले ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत, त्यांना १४ एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

 वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस असून, पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले.दिड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी ३० जून २०१८ पर्यंत  आहे.राज्य शासनाने १३ मार्च २०१८ रोजीच्या निर्णयानुसार कर्जमाफीस व एकवेळ समझोता योजनेस (वन टाईम सेटलमेंट) पात्र शेतकऱ्यांच्या थकीत रक्कमेवर १ ऑगस्ट २०१७ ते कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या कालावधीत व्याज आकारू नये, अशा सूचना सर्व बँकांना व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांना दिल्या आहेत. याऊपरही काही बँका व्याज आकारत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.कर्जमाफी योजनेस पात्र असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपले ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत, त्यांना १४ एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तसेच शासनाच्या ७ डिसेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार एकवेळ समझोता योजनेंतर्गत दीड लाख रुपयांवरील रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत देण्यात आली होती. ही मुदत ३० जून २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कटके यांनी केले आहे.दरम्यान, ग्रामीण भागातील काही आपले सरकार सेवा केंद्रात नेट कनेक्टिव्हीटी नसल्याने शेतकऱ्यांना शहरी भागात अर्ज भरण्यासाठी यावे लागत आहे. कर्जमाफीच्या अर्जासाठी आता शेवटचा एक दिवस शिल्लक असल्याने शेतकरयांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन कटके यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती