शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

भुसंपादनाची गती मंदावली; समृद्धी महामार्ग निर्मितीस विलंब!, कृषी समृद्धी केंद्रांना बगल, केवळ रस्ता निर्मितीस प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 8:50 AM

नागपूर ते मुंबई या ७१० किलोमिटर अंतराच्या समृद्धी महामागार्साठी राबविण्यात येणारी भुसंपादन प्रक्रिया प्रशासनासाठी बहुतांशी किचकट ठरत असून ६ जानेवारीपर्यंत ४० ते ४५ टक्केच भुसंपादन झाले आहे.

- सुनील काकडे

वाशिम- नागपूर ते मुंबई या ७१० किलोमिटर अंतराच्या समृद्धी महामागार्साठी राबविण्यात येणारी भुसंपादन प्रक्रिया प्रशासनासाठी बहुतांशी किचकट ठरत असून ६ जानेवारीपर्यंत ४० ते ४५ टक्केच भुसंपादन झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा रोष थोपविण्यासाठी कृषी समृद्धी केंद्र उभारण्याच्या मुद्यास सोयीस्कर बगल देत केवळ रस्त्याकरिता लागणारी जमिनच संपादन करण्यावर विशेष भर दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.राज्यातील नागपूर, अमरावती, वर्धा, वाशिम, बुलडाणा, जालना, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक आणि ठाणे असे १० जिल्हे व त्याअंतर्गत येणाऱ्या ३९२ गावांना छेदून जात असलेल्या समृद्धी महामागार्साठी संयुक्त मोजणीची कामे पूर्ण झाल्यानंतर आता भुसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसून ६ जानेवारीपर्यंत वाशिमसह काहीच जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत भुसंपादन झाले असून इतर जिल्ह्यांमध्ये भुसंपादनाचे प्रमाण अगदीच कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यशासनाकडून समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यानंतर प्रारंभी शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा कांगावा करित शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कृषी समृद्धी केंद्र उभारण्याचा निर्धार केला होता. त्यात महामागार्साठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के विकसीत भूखंड, पाल्यांना उच्चशिक्षणात सुविधा, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कुटूंबाचा समावेश, शासकीय/निमशासकीय वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या पिककजार्ची माफी आदी लाभ देऊ केला होता. सद्या मात्र कृषी समृद्धी केंद्र उभारण्याचा विषय बासनात गुंडाळून ठेवत केवळ महामागार्साठी लागणारी जमिनच सरळ खरेदी पद्धतीने संपादित केली जात आहे. शेतकऱ्यांकडून होणारा विरोध संपुष्टात आणण्यासाठी शासनाने हा मधला मार्ग काढल्याचे सिद्ध होत आहे.

आदिवासी, भुदानच्या जमिनी ठरताहेत अडचणीच्या!समृद्धी महामागार्साठी सद्या ह्यरेडी रेकनरह्णप्रमाणे तथा सरळ खरेदी पद्धतीने भुसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, यादरम्यान आदिवासी, भुदान यासाह इतर स्वरूपातील शेकडो हेक्टर जमिनींच्या संपादनादरम्यान प्रशासनाला विविध स्वरूपातील अडचणी जाणवत असून त्या निस्तरण्यासाठी सदोदित वकिलांच्या संपर्कात राहावे लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामागार्चे अंतर ९७ किलोमिटर असून ह्यड्रोनह्णव्दारे सर्वेक्षण, दगड रोवणी यासह संयुक्त मोजणी प्रक्रिया पूर्ण करून भुसंपादनाचे काम सद्या सुरू आहे. ५४ गावांपैकी २० पेक्षा अधिक गावांमधील जमिनींचे संपादन झाले असून उर्वरित गावेही लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे.- सुनील माळी, क्षेत्रीय अधिकारी तथा प्रशासक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, वाशिम