शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘रोहयो’च्या कामांकडे मजुरांनी फिरवली पाठ!

By admin | Updated: May 24, 2017 01:49 IST

प्रशासन हतबल : एक लाखापैकी १७ हजार मजूर कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केवळ २०१ रुपये दैनंदिन मजूरीत गुंतून राहण्यापेक्षा खासगीत इमारत बांधकामात दिवसाला ३०० रुपयांपेक्षा अधिक मजूरी मिळते. याशिवाय दररोज पैसा हाती पडतो, या मानसिकतेमुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर यायला मजूर तयार नाहीत. परिणामी, प्रशासनामार्फत हाती घेण्यात आलेली असंख्य कामे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात १० हजार ६१४, मालेगाव १५ हजार ५४३, मंगरूळपीर २७ हजार १०३, मानोरा १४ हजार ५१०, रिसोड २२ हजार ७१० आणि वाशिम तालुक्यात १२ हजार ९४७, असे एकंदरित १ लाख ३ हजार नोंदणीकृत जॉबकार्डधारक मजूर आहेत. असे असले तरी सद्या सिंचन विहिर, वृक्षलागवड, रोपवाटिका, शौचालय, शोषखड्डे, घरकुलांच्या सुरू असलेल्या एकंदरित १३२५ कामांवर त्यापैकी केवळ १७ हजार ५३६ मजूरच कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मजूरांकडून कामांची मागणीच नसल्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे. म्हणायला, शासनाने १ एप्रिलपासून मजूरांच्या मजूरीत ९ रुपये वाढ केली आहे. जॉबकार्डधारक मजूरांना पूर्वी १९२ रुपये प्रतिदिन मजूरी दिली जायची. त्यात ९ रुपयांची वाढ करित शासनाने १ एप्रिल २०१७ पासून दैनंदिन मजूरी २०१ रुपये केली आहे. मात्र, ती देखील तुलनेने कमी असल्याने मजूरांकडून ‘रोहयो’कडे कामांची मागणीच केली जात नसल्याची वस्तूस्थिती आहे.खात्यात पैसे जमा करण्याच्या पद्धतीबाबत नाराजी!अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या मजूरांना कुटूंबाचा उदरनिर्वाह करित असताना दोनवेळच्या जेवणाची देखील भ्रांत पडते. त्यामुळे दिवसभर काम केल्यानंतर त्याचा मोबदला सायंकाळी हातात पडायला हवा, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, ‘रोहयो’अंतर्गत मजूरीचे पैसे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्याची पद्धत १ एप्रिल २०१७ पासून अंगिकारण्यात आली असून हा पैसा बँकेतून ‘विड्रॉल’ करणे जिकीरीचे ठरत असल्याने या किचकट पद्धतीबाबत मजूरांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असंख्य कामे मंजूर आहेत. कामांची मागणी झाल्यानंतर तत्काळ मजूरांना काम देखील उपलब्ध करून दिले जाते. मात्र, वारंवार आवाहन करूनही ही कामे करण्याकरिता मजूर उपलब्ध होत नसल्याने सिंचन विहिर, पांदन रस्ते यासह इतरही कामे प्रलंबित राहत आहेत.- सुनील कोरडेउपजिल्हाधिकारी, रोहयो, वाशिम