शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘रोहयो’च्या कामांकडे मजुरांनी फिरवली पाठ!

By admin | Updated: May 24, 2017 01:49 IST

प्रशासन हतबल : एक लाखापैकी १७ हजार मजूर कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केवळ २०१ रुपये दैनंदिन मजूरीत गुंतून राहण्यापेक्षा खासगीत इमारत बांधकामात दिवसाला ३०० रुपयांपेक्षा अधिक मजूरी मिळते. याशिवाय दररोज पैसा हाती पडतो, या मानसिकतेमुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर यायला मजूर तयार नाहीत. परिणामी, प्रशासनामार्फत हाती घेण्यात आलेली असंख्य कामे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात १० हजार ६१४, मालेगाव १५ हजार ५४३, मंगरूळपीर २७ हजार १०३, मानोरा १४ हजार ५१०, रिसोड २२ हजार ७१० आणि वाशिम तालुक्यात १२ हजार ९४७, असे एकंदरित १ लाख ३ हजार नोंदणीकृत जॉबकार्डधारक मजूर आहेत. असे असले तरी सद्या सिंचन विहिर, वृक्षलागवड, रोपवाटिका, शौचालय, शोषखड्डे, घरकुलांच्या सुरू असलेल्या एकंदरित १३२५ कामांवर त्यापैकी केवळ १७ हजार ५३६ मजूरच कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मजूरांकडून कामांची मागणीच नसल्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे. म्हणायला, शासनाने १ एप्रिलपासून मजूरांच्या मजूरीत ९ रुपये वाढ केली आहे. जॉबकार्डधारक मजूरांना पूर्वी १९२ रुपये प्रतिदिन मजूरी दिली जायची. त्यात ९ रुपयांची वाढ करित शासनाने १ एप्रिल २०१७ पासून दैनंदिन मजूरी २०१ रुपये केली आहे. मात्र, ती देखील तुलनेने कमी असल्याने मजूरांकडून ‘रोहयो’कडे कामांची मागणीच केली जात नसल्याची वस्तूस्थिती आहे.खात्यात पैसे जमा करण्याच्या पद्धतीबाबत नाराजी!अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या मजूरांना कुटूंबाचा उदरनिर्वाह करित असताना दोनवेळच्या जेवणाची देखील भ्रांत पडते. त्यामुळे दिवसभर काम केल्यानंतर त्याचा मोबदला सायंकाळी हातात पडायला हवा, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, ‘रोहयो’अंतर्गत मजूरीचे पैसे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्याची पद्धत १ एप्रिल २०१७ पासून अंगिकारण्यात आली असून हा पैसा बँकेतून ‘विड्रॉल’ करणे जिकीरीचे ठरत असल्याने या किचकट पद्धतीबाबत मजूरांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असंख्य कामे मंजूर आहेत. कामांची मागणी झाल्यानंतर तत्काळ मजूरांना काम देखील उपलब्ध करून दिले जाते. मात्र, वारंवार आवाहन करूनही ही कामे करण्याकरिता मजूर उपलब्ध होत नसल्याने सिंचन विहिर, पांदन रस्ते यासह इतरही कामे प्रलंबित राहत आहेत.- सुनील कोरडेउपजिल्हाधिकारी, रोहयो, वाशिम