शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

‘कृषी’चा अंदाज खरा ठरला; सोयाबीनचा एकरी उतार घटला

By संतोष वानखडे | Updated: October 7, 2023 14:38 IST

जून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन सध्या कापणीला आले आहे.

वाशिम : यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाने दीर्घ दडी मारल्याने सोयाबीनच्या एकरी उत्पादनात कमालिची घट येत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. पावसाने दीर्घ खंड दिल्याने उत्पन्नात ५० टक्के घट येण्याचा अंदाज यापूर्वीच कृषी विभागाने वर्तविला होता, हे विशेष.

यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाल्याने पेरण्यादेखील विलंबाने झाल्या. ऑगस्ट महिन्यात पावसाने सलग विश्रांती घेतल्याने याचा जबर फटका सोयाबीनला बसला. ऑगस्ट महिन्यात चार आठवडयात पाऊस कमी झाला. त्यामुळे सोयाबीनच्या कळया व फुले गळून पडल्याने यावर्षी ५० टक्यांपेक्षा कमी उत्पन्न होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. अनेक संकटांवर मात करत शेतकऱ्यांनी सोयाबीनची शेती फुलवली. मात्र सोयाबीनवर मोझ्याक, तांबेऱ्याच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन सध्या कापणीला आले आहे. सोयाबीन सोंगणी, काढणीत शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येते. हलक्या प्रतीच्या जमिनीत तर एकरी दोन ते चार क्विंटल उतार येत आहे तर चांगल्या प्रतीच्या जमिनीत एकरी चार ते सात क्विंटलदरम्यान उतार येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. पावसाचा खंड, पिवळा मोझॅक आदींमुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत आहे. त्यातच बाजारभावही कोसळल्याने शेतकऱ्यांनी शेती कशी करावी? हा महत्वाचा प्रश्न आहे.- हरीश चौधरी, शेतकरी पार्डी टकमोर