शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘कृषी’चा अंदाज खरा ठरला; सोयाबीनचा एकरी उतार घटला

By संतोष वानखडे | Updated: October 7, 2023 14:38 IST

जून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन सध्या कापणीला आले आहे.

वाशिम : यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाने दीर्घ दडी मारल्याने सोयाबीनच्या एकरी उत्पादनात कमालिची घट येत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. पावसाने दीर्घ खंड दिल्याने उत्पन्नात ५० टक्के घट येण्याचा अंदाज यापूर्वीच कृषी विभागाने वर्तविला होता, हे विशेष.

यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाल्याने पेरण्यादेखील विलंबाने झाल्या. ऑगस्ट महिन्यात पावसाने सलग विश्रांती घेतल्याने याचा जबर फटका सोयाबीनला बसला. ऑगस्ट महिन्यात चार आठवडयात पाऊस कमी झाला. त्यामुळे सोयाबीनच्या कळया व फुले गळून पडल्याने यावर्षी ५० टक्यांपेक्षा कमी उत्पन्न होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. अनेक संकटांवर मात करत शेतकऱ्यांनी सोयाबीनची शेती फुलवली. मात्र सोयाबीनवर मोझ्याक, तांबेऱ्याच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन सध्या कापणीला आले आहे. सोयाबीन सोंगणी, काढणीत शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येते. हलक्या प्रतीच्या जमिनीत तर एकरी दोन ते चार क्विंटल उतार येत आहे तर चांगल्या प्रतीच्या जमिनीत एकरी चार ते सात क्विंटलदरम्यान उतार येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. पावसाचा खंड, पिवळा मोझॅक आदींमुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत आहे. त्यातच बाजारभावही कोसळल्याने शेतकऱ्यांनी शेती कशी करावी? हा महत्वाचा प्रश्न आहे.- हरीश चौधरी, शेतकरी पार्डी टकमोर