शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

 'कृषी' संजीवनी' योजनेबाबत वाशिम जिल्ह्यातील शेतकरी उदासीनच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 18:40 IST

वाशिम: थकबाकीदार कृषीपंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेण्याबाबत जिल्ह्यातील शेतकरी उदासीन असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे५१ हजारांपैकी ११०० शेतकºयांची थकबाकी जमा योजनेची मुदत १५ दिवस वाढवून ३० नोव्हेंबर करण्यात आली

वाशिम: थकबाकीदार कृषीपंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेण्याबाबत जिल्ह्यातील शेतकरी उदासीन असल्याचे दिसत आहे. या योजनेंतर्गत शुक्रवार १७ नोव्हेंबरपर्यंत एकूण ५१ हजार ४६२ थकबाकीदार शेतकºयांपैकी केवळ ११०२ शेतकºयांनी थकबाकीची रक्कम जमा करून आपली जोडणी कायम केल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सुरुवातीला १५ नोव्हेंबरपर्यंत असलेली या योजनेची मुदत १५ दिवस वाढवून ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील एकूण ५१ हजार ४६२ कृषीपंपधारक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेसाठी पात्र होते.  या शेतकºयांकडे  १५२ कोटी २३ लाख ८६ हजार ४६ रुपये मूळ थकबाकी होती. यात कारंजा तालुक्यातील ९,४०४ कृषीपंप ग्राहकांकडे २४ कोटी १३ लाख २२ हजार ७०१, मालेगाव तालुक्यात ७,६७२ ग्राहकांकडे २० कोटी १७ लाख ८२ हजार ७४७, मंगरुळपीर तालुक्यातील ७,४९३ ग्राहकांकडील २२ कोटी १८ लाख ७४ हजार ९२०, मानोरा तालुक्यात ६,११८ ग्राहकांकडे १७ कोटी २५ लाख ५५ हजार ६०९, रिसोड तालुक्यात १०,३२६ ग्राहकांकडे ३४ कोटी ३४ लाख ४१ हजार ९९०, तर वाशिम तालुक्यातील १०,४४९ ग्राहकांकडे २६ कोटी १४ लाख ८ हजार ८१ रुपयांच्या मूळ थकबाकीचा समावेश होता.  दरम्यान, कृषीपंपांची वाढती थकबाकी लक्षात घेता वसुली करण्याच्या उद्देशाने चालू देयके अदा न करणाºया कृषीपंप धारकांच्या जोडण्या खंडीत करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला. तथापि, अपुºया पावसामुळे दुष्काळी स्थिती ओढवली असताना महावितरणकडून थकबाकी वसुलीची मोहीम उघडण्यात आल्याने शेतकरी वर्गात महावितरणविरोधात संतापाची लाट उसळली. त्यामुळे थकबाकीदार शेतकºयांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करण्यात आली; परंतु या योजनेला शेतकºयांकडून अपेक्षीत प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसत आहे. महावितरणकडून प्राप्त आकडेवारीनुसार शुक्रवार, १७ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील एकूण थकबाकीदार कृषीपंप धारकांपैकी केवळ १,१०२ कृषीपंप ग्राहकांनी योजनेत सहभाग घेऊन २ कोटी ६० लाख ६९२ रुपयांची मूळ थकबाकी जमा केली आहे. एकूण मूळ थकबाकीच्या तुलनेत ही रक्कम केवळ १.७० टक्के आहे.  

टॅग्स :mahavitaranमहावितरण