शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

खरिप पिकांनी मान टाकली

By admin | Updated: September 29, 2014 02:27 IST

पिकांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा; भारनियमनाचा व्यत्यय.

वाशिम : जिल्ह्यात विविध संकटांमधून वाटचाल करणार्‍या शेतकर्‍यांसमोर आता पावसाने दांडी मारल्याने पिकांना वाचविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. पावसाअभावी अनेक भागातील पिके करपून जात आहेत. सिंचनाची सोय उपलब्ध असली तरी वीजपुरवठाही अनियमित राहत असल्याने ि पकांना वाचवावे कसे, या चिंतेने शेतकर्‍यांना ग्रासलेली शेतकर्‍यांचे खरिपाचे पीक मरणासन्न अवस् थेत जाऊन पोहचले आहे.चालू खरीप हंगामात जिल्ह्यात पेरणीयोग्य साडेचार लाख हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ८८ हजार हे क्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. अध्र्याअधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा, तर उर्वरित क्षेत्रात कपाशी, तूर, यासह मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल आदी पिकांची शेतकर्‍यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरणी केली होती. मूग, उडिदाचे पीक फार थोड्या प्रमाणात असले तरी या पिकालाही मध्यान्हात पावसाने मारलेल्या दडीचा दणका बसला. आधीच उशिराने झालेली पेरणी, विविध प्रकारच्या किडीतून पिकांना कसेबसे सावरणार्‍या जिल्हाभरातील शेतकर्‍याला सोयाबीन या मुख्य ि पकासह इतर पीक वाचण्यासाठी आता पावसाची प्रतीक्षा आहे. सोयाबीनची फुले बसली असली तरी शेंगा भरण्यासाठी शेतकर्‍यांना किमान एका पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकरी चा तकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. चालू खरीप हंगामाच्या सुरुवातील पावसाची उशिराने सुरुवा त झाल्याने शेतकर्‍यांना पेरणीला एक ते दीड महिने उशिरा झाला. सध्या सोयाबीनच्या पिकाचा दाणा भरण्याची स्थिती जिल्ह्यातील बहुतांश भागात असल्याने पावसाची गरज आहे. प्रखर तापणार्‍या उन्हामुळे शेतजमिनी कडक झाल्या आहेत. उष्णतेमुळे अळय़ांचा प्रादुर्भावसुद्धा वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीत ओलावा नसल्याने पिके कोमेजून व करपून जात आहे. हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटात सापडले असताना, त्याला मोटारपंपाद्वारे पाणी देऊन जीवनदान देण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांवर अनियमित वीजभारनियमन व खंडित होणार्‍या वीजपुरवठय़ाने खोडा घातला आहे. वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने पिकांना पाणीही देता येत नाही. परिणामी, शेतकरी आणखीच चिंताग्रस्त बनला आहे.