शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मालेगाव तालुक्यात होणार ७९२०७ हेक्टरवर खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

अमाेल कल्याणकर मालेगाव : तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ७९ हजार २०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. काही पेरणी झाली ...

अमाेल कल्याणकर

मालेगाव : तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात ७९ हजार २०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. काही पेरणी झाली असून, काही ठिकाणी बाकी आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक पेरा सोयाबीनचा वाढणार असून, शेतकऱ्यांची सोयाबीनला पसंती मिळत आहे. मका, बाजरी आणि ऊस पेरणीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात खरीप पिकाच्या लागवडीयोग्य सर्वसाधारण क्षेत्र ७० हजार ५५२ हेक्टर आहे. तालुक्यातील जमीन समतल असून, बहुतांश क्षेत्र सिंचनाखाली आहे. तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद, तीळ व कापूस ही पिके घेतली जातात. त्याचबरोबर करडई, सूर्यफूल व इतर गळीत धान्यांचाही पेरा केला जातो. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या खरीप हंगाम नियोजनानुसार यावर्षी पीकनिहाय क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात ज्वारी २५५ हेक्टर, इतर पिके अर्थात भाजीपाला ५६० हेक्टर, तूर ८७५० हेक्टर, मूग ९०० हेक्टर, उडीद १२०० हेक्टर, सोयाबीन ५३९८४ हेक्टर आणि कपाशी ११६५ हेक्टर, ऊस १५ हेक्टर क्षेत्र याप्रमाणे पीकपेऱ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक पेऱ्यात वाढ झालेली नाही. यावर्षी सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल वाढला आहे. त्यातच यावर्षी कृषी विभागाकडून घरच्याच बियाणांची उगवण क्षमता तपासून तेच बियाणे पेरणीसाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले असून, बहुतांश शेतकऱ्यांनी त्यास प्रतिसाद दिला आहे. यामुळे तालुक्यात बियाणे तुटवडा जाणवला नाही. तालुक्यात आतापर्यंत झालेला पाऊस हा सार्वत्रिक स्वरूपाचा नसून, काही भागात तुलनेने कमी पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे अशा काही ठिकाणच्या पेरण्या होणे अद्याप बाकी आहे. आतापर्यंत १९३.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

.............

यावर्षी शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुसंख्य शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरले आहे. त्यामुळे बियाणांचा तुटवडा पडला नाही.

- शशिकिरण जांभरूनकर, तालुका कृषी अधिकारी, मालेगाव