शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

कवितेतून वास्तव मांडणे गरजेचे - महेंद्र ताजणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 14:44 IST

आंंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते ,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाडमय व सांस्कृतीक संवर्धन मंचचे अध्यक्ष तथा विद्रोही कवी महेंद्र ताजणे त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मानवी जीवनमुल्यांचे सर्जक नक्षत्रं कवितेतून उगवतात. परंतु काही कविंनी उठबस कविता बनविणे सुरु केल्याने कविता नकोसे म्हणणारे अनेक जण आहेत. यामुळेच कवितेचा वाचक मर्यादित झालेला आहे. यासह तत्सम विषयांवर आंंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते ,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाडमय व सांस्कृतीक संवर्धन मंचचे अध्यक्ष तथा विद्रोही कवी महेंद्र ताजणे त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

कविता उदंडपणे लिहिली जातेय, कवितेच्या दर्जाबद्दल काय सांगाल?मुलत: कविता लिहिणे ही अतिशय गंभीर प्रक्रीया आहे आणि असते. भोवतीच्या जळत्या अरण्यात जगण्याचे अनेक जळते प्रश्न निराधर झाले आहेत. कवितेच्या माध्यमातून हा जटिल गुंता सोडविता येऊ शकते. कवितेचं अविष्करण उदंड पातळीवर होत असलं आणि तिच्या दर्जेच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित होत असले तरी आज लिहिली जाणारी कविता मला खूपच आश्वासक वाटते. आशय आणि रचनाबंधनेच्या पातळीवर विविधांगाने ती फुलत आहे. कवितेचा गाभा अथवा तिची मुल्यरचना अधिक सर्जनशिल होताना दिसते.

कवितेला बांधीलकी असू शकते का?कवी आणि कविची भूमिका या वेगळया दोन भूमिका असू शकत नाहीत. कविला कवितेतून वेगळं बाजुला काढता येत नाही. कविता हिच कविची भूमिका असते आणि कवी असणे ही सुध्दा एक भूमिकाच असते. भूमिकाविहिन कविता ही समुद्रात भरकटलेल्या नावेसारखी असते. दिशाहिनता जीवनाला विध्वंसक विवराकडे घेऊन जाते. दिशादर्शी कविता मानवी जीवनाला परिपूर्णत्वाकडे घेऊन जाते.

तुम्ही तुमच्या कविताकडे कसे बघता?मी कविता लिहितो म्हणजे माझ्या जखमी आयुष्याच्या तडफडीची जळती लिपी मी उदघोषित करीत असतो. व्यवस्थेने दिलेल्या सलत्या जखमा मला कविता लिहायला भाग पाडतात.

तुमच्या पुस्तकांना कोणते पुरस्कार मिळाले?पुरस्कार मिळण्यापेक्षा वाचकांच्या जया चांगल्या प्रतिक्रीया येतात तोच साहित्यीक, कवींसाठी उत्कृष्ट पुरस्कार असतो. तरी सुध्दा माझ्या ‘अस्वस्थ वर्तमानाच्या कविता’ संग्रहाला हिंगोली वाचनालयाच्या ‘मनोहर स्मृती पुरस्कार’ आणि ‘ग्लोबल महासत्तेचा इस्फोट’ या कविता संग्रहाला अमरावतीचा सुदाम सावरकर राज्यस्तरिय पुरस्कारा मिळाला आहे. यासह जिल्हास्तरावरील अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.. मानवी जीवनाचा सर्वांगिण आशय कवितेतून उगविला तर कविता वाचाविसी वाटते. कविता म्हणजे काय तर आपल्याला जे आवडते ते इतरांनाही आवडावे अशी कलाकृती म्हणजे कविता होय. मग ती कोणत्याही विषयावर असून शकते. प्रेम कवी खूप आहेत वास्तव मांडणारे कवी हवे आहेत.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत