शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

Ground Report : 'समृद्धी'मुळे अंतर्गत रस्त्यांची चाळण; रोजगाराचा पत्ता नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 13:50 IST

-  सचिन राऊत  लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा : कारंजा विधानसभा मतदारसंघातील काही गावांच्या शिवारात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू ...

-  सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : कारंजा विधानसभा मतदारसंघातील काही गावांच्या शिवारात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यांसाठी बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे तालुक्यातील पोहा, कारंजा आणि मोहगव्हाण या परिसरात असलेल्या गावातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड चाळण झाल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत उघड झाले. कारंजा-मानोरा हा मुख्य रस्ता केवळ खड्ड्यांमध्येच राहिला असल्याने दर दिवसाला या रोडवर अपघात घडत असल्याचे मानोरावासीयांचे म्हणणे आहे.कारंजा विधानसभा मतदारसंघातील कारंजानंतर मानोरा हे तालुक्याचे ठिकाण आणि मोठे शहर आहे. मानोरा येथील अनंत पाटील हे एकदा आमदार झाले; मात्र त्यानंतर केवळ कारंजा येथील रहिवासी असलेलेच आमदार या मतदारसंघात निवडून आले. त्यामुळे मानोरा तालुका विकासापासून कोसो दूर आहे. आ. राजेंद्र पाटणी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागताच भर पावसाळ्यात बंधाऱ्यांच्या कामाच्या उद्घाटनाचा सपाटा लावला; मात्र त्यापूर्वी आमदारांनी या तालुक्याला सावत्र वागणूक दिल्याचा आरोप मतदारांनी केला आहे.शिक्षणाची पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या कारंजा शहरात मोठे इन्स्टिट्युट तसेच रोजगारासाठी प्रयत्नच झाले नसल्याचेही लोकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील ९० अधिक खेड्यांतील रोहित्र वारंवार नादुरुस्त असतात, याच्या तक्रारीही दूर्लक्षीतच राहिल्याचेही अनेकांनी सांगीतले.भूसंपादन १५ वर्षांपूर्वी; मात्र मोबदला नाही!नागपूर-जालना या मार्गासाठी कारंजा शहरासह तालुक्यातील काही ठिकाणची भूसंपादन प्रक्रिया १५ वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आल्याची माहिती हॉटेल संचालकांनी दिली; मात्र भूसंपादनानंतर शासनाने मोबदलाच दिला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बंधाºयाच्या कामांचे पावसाळ्यात भूमिपूजनआ. राजेंद्र पाटणी यांनी पाच वर्षांच्या कालावधीत मानोरा तालुक्यातील विकास कामे केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला; मात्र गत काही महिन्यांपासून त्यांनी पावसाळ्यातच बंधाºयांची कामे करण्यासाठी उद्घाटनाचा सपाटा लावला. यावरून विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यासाठी आता त्यांना मानोरा दिसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.कारंजा ते धनज या २६ किलोमीटरच्या रस्त्याचे गत काही वर्षांपासून द्विपदरीकरण करण्यात येत आहे. १० ते १२ किलोमीटरपर्यंत हा रस्ता द्विपदरी करण्यात आला आहे. त्यानंतर एकाच बाजूने केवळ खडीकरण करण्यात आले आहे. अर्धवट आणि ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरलेल्या या रस्त्याचे काम प्रचंड संथ गतीने सुरू असतानाही या रोडवरील चार ते पाच गावांमध्ये आतापर्यंत या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

संजय गांधी निराधार योजना अध्यक्षाविनाकारंजा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेला गत अनेक महिन्यांपासून अध्यक्षच नाही. त्यामुळे निराधार योजनेचे कामकाज प्रभावित झाले असल्याचा आरोप निराधारांनी केला आहे. पूर्वीच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे पद रिक्त असून, आमदारांनी याकडे कानाडोळा केला आहे.

कारंजा वन पर्यटनाची कामे रखडली!कारंजा वन पर्यटन केंद्र उभारण्यात आले आहे. सदर वन पर्यटन केंद्र पूर्णत्वास आले असले तरी याचा पुढील विकास मात्र खुंटल्याचे वास्तव आहे. कारंजा वन पर्यटन केंद्राच्या अत्याधुनिकीकरणाकडे आमदारांनी पाठ फिरविल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वन पर्यटनामध्ये लावण्यात आलेली झाडांची योग्य निगा राखण्यात येत नसल्याचेही नागरिकांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बसस्थानकावर धुळीचे साम्राज्यकारंजा बसस्थानकावर साधे डांबरीकरणही करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना दिवसभर धुळीतच राहावे लागत असल्याचे चित्र कारंजा बसस्थानकावर दिसले. पार्किंग सुविधेचाही बट्ट्याबोळ असून, एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी येणाºया वृद्धांनाही दिवसभर ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र बसस्थानकावर होते.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाPoliticsराजकारणRajendra Patniराजेंद्र पाटणीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग