शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईची मोहीम राबविण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:38 IST

............... अकोला-पूर्णा पॅसेंजर गाडी बंद अनसिंग : वाशिममार्गे अकोला-पूर्णा, पूर्णा-अकोला, अकोला- परळी, परळी-अकोला या पॅसेंजर ...

...............

अकोला-पूर्णा पॅसेंजर गाडी बंद

अनसिंग : वाशिममार्गे अकोला-पूर्णा, पूर्णा-अकोला, अकोला- परळी, परळी-अकोला या पॅसेंजर रेल्वे धावत होत्या. आता या रेल्वे गाड्या बंद आहेत. यामुळे प्रवाशांना बसने प्रवास करावा लागत आहे. बसचा प्रवास महागडा असल्याने रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून हाेत आहे.

................

विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले

ताेंडगाव : अनुसूचित जमाती प्रवर्गातील (एसटी) विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत इयत्ता पहिली आणि दुसरीत सन २०२१-२२ या सत्रात मोफत प्रवेश दिला जाणार असून, यासाठी अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने केले आहे.

................

‘नो पार्किंग’मधील वाहने हटविली!

वाशिम : जिल्हा परिषद परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडत असून, ‘नो पार्किंग’मध्येच वाहने उभी केली जात हाेती. यामुळे येथे येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत हाेता. यासंदर्भात ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले हाेते. सद्यस्थितीत नाे पार्किंगमध्ये वाहने ठेवण्यात येत नसल्याचे दिसून आले.

...............

दरराेज पाणी पुरवठा करण्याची मागणी

रिसाेड : प्रकल्पात पुरेशा प्रमाणात जलसाठा असूनही भर जहगीर येथे ग्रामपंचायतीतर्फे दोन दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. भर जहागीर येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठ्याची सोय झाली आहे. त्यामुळे दरराेज पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.

................

रीडिंग न घेताच वीज ग्राहकांना देयके

शेलुबाजार : रीडिंग न घेताच वीज ग्राहकांना अवाच्या सव्वा वीज देयके आकारून ग्राहकांची लूट केल्या जात असल्याचा प्रकार महावितरणकडून सुरूच असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात गतवर्षात ३९१ तक्रारी रीडिंग न घेता देयक दिल्याच्या झाल्या आहेत. तरीही महावितरणकडून अनेक ग्राहकांना अंदाजे देयक देण्यात येत आहे. महावितरणने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

..............

मालेगाव-किन्हीराजा रस्त्यावर खड्डे

मालेगाव : मालेगाव ते किन्हीराजा रस्त्यावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना संबंधितांकडून काेणत्याच प्रकारची दखल घेण्यात येत नसल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दरराेज वाहनांचे नुकसान व अपघात घडत आहेत. अखेर परिसरातील शेतकऱ्यांनी खड्डे बुजविले आहेत.