शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच बियाणे, खते देण्याचा कृषी विभागाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 16:11 IST

घरपोच खते, बियाणे देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : खरीप हंगामात खते, बियाणे खरेदीसंदर्भात शेतकºयांची गैरसोय होऊ नये तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शेतकºयांची कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून शासनाच्या संकेतस्थळावर मागणी नोंदविल्यास घरपोच खते, बियाणे देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शेतकºयांनी अधिक दक्षता बाळगावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शशिकरण जांभरूणकर यांनी केले.खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून शेतकºयांतर्फे शेती मशागतीची कामे केली जात आहे. काही दिवसातच खरीप पीक पेरणी सुरू होण्याचे संकेत लक्षात घेता शेतकºयांची खते, बियाण्यांसाठी जुळवाजूळव सुरू झाल्याचे दिसून येते. दरम्यान, शेतकºयांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सोयाबीन हे सरळ वाण असल्यामुळे दरवर्षी नवीन बॅगचे बियाणे वापरण्याची आवश्यकता नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. मागच्या वर्षीचे सोयाबीन उगवण शक्ती तपासून पेरता येते. उगवण शक्ती ७० टक्के असल्यास ३० किलो बियाणे एकरी वापरावे व ६५ टक्के उगवण असल्यास ३५ किलो बियाणे एकरी वापरावे, उगवण शक्ती कशी तपासावी याबाबत आपल्या गावातील कृषी सहायक, कृषी मित्र तसेच प्रगतशील शेतकरी यांच्याद्वारे प्रात्यक्षिक करून दाखविण्याची मोहीम खरीप हंगामपूर्वी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे, असे  तालुका कृषी अधिकारी जांभरूणकर यांनी सांगितले. बियाण्याची उगवण शक्ती तपासण्याबाबतअडचण, शंका असल्यास आपल्या गावातील कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधा.  तसेच कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये यासाठी बाजारात येण्याचे टाळा, आपणास लागणाº्या बियाणे, खताची मागणी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदविल्यास  आपणास  घरपोच बियाणे व खते रास्त दरामध्ये आपल्या पसंतीच्या कृषी सेवा केंद्रा मार्फत पोहचविल्या जातील. खते व बियाणेची मागणी कशी करावी यासाठी कृषी सहायक, कृषी मित्र, प्रगतशील शेतकरी यांची मदत घ्यावी, असे जांभरूणकर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती