शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

भारतीय संविधान मानव समाजाचे सुरक्षा कवच - युसूफ पुंजानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 20:40 IST

भारतीय संविधानामुळे सर्व मानव समाजाला सुरक्षा प्रदान झाली असून भारतीय संविधान हे सर्व भारतीय समाजाला आपले अधिकार प्राप्त करून देणारे व समजामध्ये सन्मानाने जगण्याचे प्रभावी शस्त्र असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसूफ पुंजानी यांनी केले.

ठळक मुद्देयुसूफ पुंजानी यांचे प्रतिपादन संविधान सन्मान दिन

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : भारतीय संविधानामुळे सर्व मानव समाजाला सुरक्षा प्रदान झाली असून भारतीय संविधान हे सर्व भारतीय समाजाला आपले अधिकार प्राप्त करून देणारे व समजामध्ये सन्मानाने जगण्याचे प्रभावी शस्त्र असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसूफ पुंजानी यांनी केले. भारिप बहुजन महासंघाच्यावतीने २६ नोव्हेंबर रोजी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय संविधान सन्मान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर भूमिपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिला उजाळा देण्यात आला. पुंजाणी म्हणाले की, संविधान निर्माण समितीचे अध्यक्ष डॉ.  बाबासाहेब  आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाला समर्पित केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सतत २ वर्ष ११ महिने १८ दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन संविधानाची निर्मिती केली. सदर संविधान २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आले. भारत सरकारने बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षनिमित्त २६ नोव्हेंबर २०१५ पासून संविधान सन्मान दिवस म्हणून साजरा केला. परंतु आंबेडकरवादी जनता ही दशकापासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करीत आह. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची, विचारधारेची कास धरने अत्यंत आवश्यक असल्याचे पुंजाणी म्हणाले. कार्यक्रमाला कारंजा नगराध्यक्ष शेषराव ढोके, उपाध्यक्ष एम. टी. खान, नगरसेवक जुम्मा पप्पुवाले, निसार खान, सय्यद मुजाहिद एजाज शेख, जवेदोद्दीन, चंदन गणराज, अ. रशीद, सलीम गारवे, सलीम प्यारेवले, राजू इंगोले, रशीद निमसुरवाले, जाकिर शेख, भारिप-बमस तालुकाध्यक्ष भारत भगत, देवराव कटके, राजाभाऊ चव्हाण, राजू वानखड़े, देवानंद कांबळे, बबन वानखड़े, समाधान सिरसाठ, अरविंद भगत, संजय प्रगणे, शामराव कांबळे,  कौसल्याबाई मोटघरे, अ‍ॅड. कुंदन मेश्राम, अ‍ॅड. धम्मानंद देवळे, राजेश मस्के, तुळशिराम गुलदे, जि.प. सदस्य मोहन महाराज राठोड, दिलीप सावजी, अर्चना मेश्राम आदिंसह नगर परिषद सदस्य, पदाधिकारी व भारिप-बमसंच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.