शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

वाहनातील धुरामुळे आजारात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:37 IST

डोळ्यावर ही विषारी वायूचा प्रभाव पडत असल्याने डोळ्याचे आरोग्य बिघडविण्यास विषारी वायू घातक असल्याचे बोलल्या जाते. आधुनिक जीवनशैली, औद्योगिकीकरण ...

डोळ्यावर ही विषारी वायूचा प्रभाव पडत असल्याने डोळ्याचे आरोग्य बिघडविण्यास विषारी वायू घातक असल्याचे बोलल्या जाते. आधुनिक जीवनशैली, औद्योगिकीकरण आदी घटकांमुळे डोळे प्रभावित होत आहेत. मानव जीवनात डोळ्याला अनन्यसाधारण महत्व असून तो महत्वाचा घटक आहे. डोळ्यांच्या आजारामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांनादेखील शासकीय यंत्रणा यावर उपचाराबाबत दखल घेत नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जाते. आठवड्यातून एक दिवस नेत्र तपासणी केल्या जात असल्यामुळे त्या दिवशी ग्रामीण भागातील नागरिक ग्रामीण रुग्णालयात पोहचत नाही. त्यामुळे डोळ्यांच्या आजारात वाढ होऊन खासगी रुग्णालयात उपचार करावा लागतो. मात्र सामान्य नागरिकांना न परवडणारी ही बाब असून खिशाला कात्री लागत आहे. वायुप्रदूषण, रस्ता कामातील धूर, अनेक विषारी वायू डोळ्यांच्या दृष्टीपटलास इजा पोहोचविण्यास कारणीभूत ठरत आहे.

00000000000000000

वाशिम शहरात कूपनलिकांची पाणी पातळी खालावली

वाशिम : शहरातील अनेक भागातील खाजगी कूपनलिका आटल्या आतहे, तर काही शेवटची घटका मोजत आहे. कूपनलिकेची संख्या लक्षात पाणी टंचाईचा प्रश्न येत्या काही दिवसात पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होऊन पाण्याची बचत करावी असे आवाहन सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.

मालेगाव शहर हे पाणी टंचाईग्रस्त आहे. शहरात अनेक वर्षापासून नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व शुध्द पाणी नाही तर दरवर्षी उन्हाळ्यात शहरात पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवते तर टँकरव्दारा पाणी पुरवठा करावा लागतो. मालेगाव शहरात पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या संख्येने खाजगी बोअरचा वापर केल्या जातो. त्यात गोरगरीब व मागासलेल्या भागात सोडून जवळपास घराघरात खाजगी बोअर घातलेले आहे. या खाजगी बोअरचा मोठा आधार लोकांना आहे, परंतु त्यातील अनेकांचेच्या खासगी कूपनलिकाही उन्हाळ्यात पाण्याअभावी बंद पडतात, यावर्षी मात्र तशी परिस्थिती येणार नाही असे वाटत होते, कारण मागील वर्षी पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला.

परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळा सुरु होताच पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे व त्याचाच परिणाम म्हणून शहरातील अनेक भागातील रहिवासांचे खाजगी कूपनलिकांचे पाणी झपाट्याने कमी झाले व त्यामुळे अनेकांचे बोअर बंद पडले तर अनेकांच्या कूपनलिका शेवटची घटका मोजत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता विहिरीचे अधिग्रहण करणे व टँकरव्दारा पाणी पुरवठा करण्याची योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी होत असून यासाठी नगर परिषद प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे वेळीच पाठपुरावा करावा जेणेकरुन मालेगाव शहरातील नागरिकांना उन्हाळ्यात भटकंतीची वेळ येणार नाही.