शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

कारंजासह ग्रामीण भागात चोरीच्या प्रमाणात वाढ!

By admin | Updated: July 15, 2017 01:54 IST

नागरिक भयभीत : दोन महिन्यात सात लाख रुपयांपेक्षा अधिक ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : शैक्षणिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या कारंजा शहर गत दोन महिन्यांपासून चोरट्यांचा दहशतीखाली वावरत असल्याचे दिसून येते. गत दोन महिन्यांत सात लाख रुपयांपेक्षा अधिक ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून, अद्याप चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले नाही.कारंजा शहरात शहरासाठी व ग्रामीण भागासाठी, असे दोन स्वतंत्र पोलीस स्टेशन आहेत. शहरातील अवैध धंदे व चोरीचे प्रमाण कमी होण्यासाठी पोलीस यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षित आहे. शहरासह ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. गेल्या जून ते जुलै महिन्यात जवळपास पाच ठिकाणी दिवसासह रात्री चोरट्यांनी मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. याशिवाय भुरट्या चोऱ्याही सुरू असल्याने नागरिक भयभीत आहेत. कारंजा शहर पोलीस स्टेशनला ८१ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, तर ८० पोलीस कर्मचारी आहेत. यामध्ये चार महिला व पाच चालकांचा समावेश आहे. तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनला ७३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये एक पोलीस निरीक्षक, १ सहायक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक व ७० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या जून महिन्यापासून, तर आतापर्यंत चोऱ्या मोठ्याा प्रमाणात झाल्याचे दिसून येते. दिवसाही चोऱ्या होत आहे. पोलिसांचा वचक नसल्याने चोरट्यांचे फावत असल्याचे बोलले जाते. कारंजा भाजीबाजार येथील एक दुकान फोडून दुकानातील रोख ५४ हजार ३०० रुपयांचा माल चोरी गेल्याची घटना १६ जूनच्या रात्री घडली होती. काही दिवसांतच शिक्षक कॉलनीतील बलदेव रंगराव चव्हाण यांच्या घरातून १ लाख ६० हजार रुपयाचा माल लंपास केला. २९ जून रोजी ज्ञानेश्वर जयसिंग गळकर रा. कारंजा यांच्या घरी दिवसा चोरी होऊन ६० हजार रुपयांचा माल चोरी गेला. ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील ग्राम कामठवाडा येथे रात्रीच्या वेळी बकरी चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला गावकऱ्यांनी १ जुलैच्या पहाटे पकडले. ११ जुलै रोजी यशोदानगरातील प्रा. प्रेमनाथ दाभाडे हे घर मालक बाहेरगावी, तर महिला टायपिंगला गेली असल्याचे पाहून घराच्या मुख्य दाराचे कुलूप फोडून घरामधील १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. तसेच कारंजा शहरातील लाहोटी प्लॉटमध्ये रहिवासी असलेले समीर खा अमीर खा हे ८ ते १३ जुलैदरम्यान गावाला गेले होते. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप फोडून घरामधील दोन सोन्याच्या अंगठ्या व दीड लाख रुपये चोरून नेल्याची घटना १३ जुलै रोजी उघडकीस आली. याकडे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्यासह ठाणेदारांनी लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.चोरींची प्रमाण वाढले, हे निश्चित आहे. मागील काळात झालेल्या चोऱ्यांचा अभ्यास करून या चोऱ्यांचा तपास पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यासाठी नागरिकांनी अनोळखी इसम संशयास्पद स्थितीत फिरताना आढळल्यास पोलिसांना कळवावे. तसेच बाहेरगावी जाणाऱ्या कुटुंबांनी पोलिसांना माहिती द्यावी. डॉ. रत्नाकर नवलेउपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा