शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचे प्रमाण दुप्पट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 11:46 IST

Washim News कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभागाची मोठी धडपड सुरू असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचे प्रमाण दुपटीच्या जवळपास आहे. त्यात जिल्ह्याच्या सिमालगत असलेल्या भागांत हे प्रमाण अधिक असून, कारंजा तालुक्यातील धनज बु.सह परिसरात कोरोना संसर्गाचा उद्रेकच होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून, हा कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभागाची मोठी धडपड सुरू असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात २१ फे ब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या सहा दिवसांत एकूण ९७३ लोकांना कोरोना संसर्ग झाला. त्यात देगाव निवासी शाळेतील १९० मिळून ग्रामीण भागातील ६४१ लोकांचा समावेश आहे.वाशिम जिल्ह्यातऑक्टोबरच्या मध्यंतरापासून कोरोना संसर्ग नियंत्रित होऊ लागला. नववर्षातील पहिल्याच महिन्यात कोरोना संसर्गाची स्थिती अत्यंत कमी झाली. उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या अगदी ३० पर्यंत पोहोचली होती; परंतु फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यापासून कोरोना संसर्गात वाढ होऊ लागली आणि गत आठवड्यात तर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेकच झाला. प्रामुख्याने शहराच्या तुलनेत ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचे रुग्ण अधिक वाढू लागले. त्यामुळे संपर्कातील व्यक्तींची चाचणी झपाट्याने करण्याची कसरत आरोग्य विभागाला करावी लागत आहे. जिल्ह्यात २१ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान आढळलेल्या ९७३ कोरोनाबाधितांपैकी ६३१ रुग्ण हे ग्रामीण भागातीलच आहेत. त्यात देगाव येथील निवासी शाळेत आढळलेल्या १९० जणांचा समावेश आहे.  

जिल्ह्यांच्या सिमेवरील गावची स्थिती गंभीरलगतच्या अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात या आठवड्यापूर्वीच कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. वाशिम जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या गावातील लोकांचे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आवागमन होत असतानाच त्या जिल्ह्यातील नागरिकांचाही वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रवास सुरू असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या गावांत कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे. त्यात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या धनज आणि कामरगाव परिसरातील गावांचा समावेश आहे. 

चेकपोस्टवरील तपासणीही कुचकामी अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील नागरिक कारंजामार्गे मोठ्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यात दाखल होत आहेत. यातून कोरोना संसर्गास वाव मिळू नये म्हणून जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार कारंजा तहसीलदारांनी वाशिम जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या दोनद बु., ढंगारखेड, मेहा, सोमठाणा आणि खेर्डा येथे चेकपोस्ट सुरू करून आरोग्य कर्मचाºयांसह पोलिसांची नियुक्ती केली. तेथे परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांची तपासणी करूनच वाशिम जिल्ह्यात प्रवेश दिला जात असला तरी, जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम