शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचे प्रमाण दुप्पट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 11:46 IST

Washim News कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभागाची मोठी धडपड सुरू असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचे प्रमाण दुपटीच्या जवळपास आहे. त्यात जिल्ह्याच्या सिमालगत असलेल्या भागांत हे प्रमाण अधिक असून, कारंजा तालुक्यातील धनज बु.सह परिसरात कोरोना संसर्गाचा उद्रेकच होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून, हा कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभागाची मोठी धडपड सुरू असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात २१ फे ब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या सहा दिवसांत एकूण ९७३ लोकांना कोरोना संसर्ग झाला. त्यात देगाव निवासी शाळेतील १९० मिळून ग्रामीण भागातील ६४१ लोकांचा समावेश आहे.वाशिम जिल्ह्यातऑक्टोबरच्या मध्यंतरापासून कोरोना संसर्ग नियंत्रित होऊ लागला. नववर्षातील पहिल्याच महिन्यात कोरोना संसर्गाची स्थिती अत्यंत कमी झाली. उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या अगदी ३० पर्यंत पोहोचली होती; परंतु फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यापासून कोरोना संसर्गात वाढ होऊ लागली आणि गत आठवड्यात तर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेकच झाला. प्रामुख्याने शहराच्या तुलनेत ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचे रुग्ण अधिक वाढू लागले. त्यामुळे संपर्कातील व्यक्तींची चाचणी झपाट्याने करण्याची कसरत आरोग्य विभागाला करावी लागत आहे. जिल्ह्यात २१ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान आढळलेल्या ९७३ कोरोनाबाधितांपैकी ६३१ रुग्ण हे ग्रामीण भागातीलच आहेत. त्यात देगाव येथील निवासी शाळेत आढळलेल्या १९० जणांचा समावेश आहे.  

जिल्ह्यांच्या सिमेवरील गावची स्थिती गंभीरलगतच्या अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात या आठवड्यापूर्वीच कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. वाशिम जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या गावातील लोकांचे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आवागमन होत असतानाच त्या जिल्ह्यातील नागरिकांचाही वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रवास सुरू असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या गावांत कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे. त्यात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या धनज आणि कामरगाव परिसरातील गावांचा समावेश आहे. 

चेकपोस्टवरील तपासणीही कुचकामी अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील नागरिक कारंजामार्गे मोठ्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यात दाखल होत आहेत. यातून कोरोना संसर्गास वाव मिळू नये म्हणून जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार कारंजा तहसीलदारांनी वाशिम जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या दोनद बु., ढंगारखेड, मेहा, सोमठाणा आणि खेर्डा येथे चेकपोस्ट सुरू करून आरोग्य कर्मचाºयांसह पोलिसांची नियुक्ती केली. तेथे परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांची तपासणी करूनच वाशिम जिल्ह्यात प्रवेश दिला जात असला तरी, जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम