शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस; शेतकरी सुखावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:28 IST

मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या कडकडाटात वाशिम ...

मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या कडकडाटात वाशिम शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, पेरणीच्या कामाला गती येण्याचा अंदाज शेतकऱ्यांमधून वर्तविला जात आहे. नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर येडशी फाट्यानजीक मरीमाता पुलावरून पूर गेल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक तासाभरासाठी वाहतूक खोळंबली होती. सध्या नव्याने पुलाचे काम सुरू होते. या पुलाची उंची आवश्यक त्याप्रमाणात न केल्याने ही समस्या कायमची निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. १० जून रोजी रिसोड शहरात जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील लिंबाचे झाड दुपारी ३ वाजेच्या सुमारास उन्मळून पडले. या झाडाखाली रामकृष्ण तांबे यांचा रिक्षा दबल्यामुळे नुकसान झाले. मंगरूळपीर तहसील कार्यालय परिसरातही पाणी साचले. मानोरा शहरात दिग्रस मार्गावर असलेल्या पुलाची उंची वाढविण्यात न आल्याने पुलावरून पाणी गेले. परिणामी, या मार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी प्रभावित झाली होती. मंगरूळपीर तालुक्यातील चिखलागड येथील अरुणावती नदीला पूर आल्याने नदीकाठावरील शेतात पाणी साचले.

०००००

बॉक्स

पुढील चार दिवस पावसाचे

नागपूर प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राने जिल्ह्यात ११ जून ते १४ जून या कालावधीत वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच १२ व १३ जून रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकरीबांधवांनी सतर्क राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे, जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. लहान मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. पुलावरून तसेच नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वत: किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पाऊस सुरू असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते. खबरदारी म्हणून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन हिंगे यांनी केले.