शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना करावे लागणार सुधारित अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:48 IST

वाशिम :  मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या जिल्हय़ांतर्गत  बदली प्रक्रियेसाठी सुधारित केलेल्या १२ सप्टेंबर २0१७ च्या  धोरणास स्थगिती देतानाच २७ फेब्रुवारी २0१७ च्या  धोरणानुसारच बदल्या करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.  त्या

ठळक मुद्देअवर सचिवाचे पत्रजिल्हय़ांतर्गत बदली प्रक्रि येत बदल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या जिल्हय़ांतर्गत  बदली प्रक्रियेसाठी सुधारित केलेल्या १२ सप्टेंबर २0१७ च्या  धोरणास स्थगिती देतानाच २७ फेब्रुवारी २0१७ च्या  धोरणानुसारच बदल्या करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.  त्यामुळे या बदली प्रक्रियेंतर्गत नव्याने अर्ज मागविण्यात येत  आहेत. यासाठी केवळ बदली अधिकार प्राप्त शिक्षक व चौथ्या  राऊंडमध्ये अर्ज करणार्‍या शिक्षकांना  सुधारित अर्ज करावे  लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवांनी १३ ऑ क्टोबर रोजी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,  शिक्षणाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात हे स्पष्टपणे सूचित केले  आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने  शासनाच्या २७ फेब्रुवारी २0१७ च्या निर्णयानुसार जिल्हा परिषद  शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी नवे धोरण तयार केले  आहे; परंतु न्यायालयीन प्रकरणांमुळे या प्रक्रियेला विलंब होत  गेल्याने शासनाने यंदा कमीतकमी बदल्या होण्याच्या अनुषंगाने  १२ सप्टेंबर २0१७ रोजी सुधारित निर्णय घेऊन संगणकीय  बदली प्रणालीद्वारे विशेष संवर्ग भाग १, २, तसेच बदली  अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदलीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक  शिक्षकांकडून बदली अर्ज भरून घेतले आहेत. उपरोक्त  संवर्गा तील शिक्षकांच्या बदल्यांमुळे विस्थापित होणार्‍या शिक्षकांकडून  अर्ज भरून घेण्यासाठी चौथी फेरीही सुरू करण्यात आली; परंतु  शासनाने या संदर्भात १२ सप्टेंबर रोजी निर्णय घेऊन अंशत:  सुधारित केलेल्या निर्णयाला काही जिल्हा परिषद शिक्षकांनी  न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवरील  सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने १२ सप्टेंबर २0१७  च्या शासन निर्णयास स्थगिती देतानाच शिक्षकांच्या जिल्हांतर्गत  बदल्या २७ फेब्रुवारीच्या धोरणानुसार करण्याचे स्पष्ट आदेश  दिले. न्यायालयाच्या याच आदेशानुसार बदली अधिकार प्राप्त, तसेच  २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या बदली  धोरणानुसार शिक्षकांकडून नव्याने अर्ज मागविणे आवश्यक  असल्याने केवळ बदली अधिकार प्राप्त शिक्षक व चौथ्या फेरीत  बदलीसाठी अर्ज केलेल्या सर्व शिक्षकांना आता नव्याने सुधारीत  अर्ज करणे आवश्यक झाले आहे. दरम्यान, या प्रक्रियेसाठी २७  फेब्रुवारी २0१७ च्या निर्णयानुसार विनंती बदल्या करण्यासाठी  सुधारीत अर्जांचे नमुने शासनाच्या बदली पोर्टलवर उपलब्ध  करून देण्यात आले असून, हे अर्ज २३ ऑक्टोबर २0१७ पर्यंत  उपलब्ध राहणार आहेत. या बदली प्रक्रियेंतर्गत संबंधित  शिक्षकांना तात्काळ अर्ज करावे लागणार असून, आपला पसं तीक्रमही दर्शविणे आवश्यक राहणार आहे.

शासनाच्या सुचनेनुसार व न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून  जिल्हय़ांतर्गत बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानुसार  शिक्षकांना सुधारित प्रक्रियेनुसार अर्ज करावे लागणार आहेत.      - अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक)

टॅग्स :Teacherशिक्षक