शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मंगरुळपीर बसस्थानकावरील गटाराकडे दुर्लक्ष;  प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 16:23 IST

वाशिम: मंगरुळपीर येथील बसस्थानक इमारतीच्या परिसराला घाणीचा विळखा बसला आहे. बसस्थानकाच्या पुढील आणि मागील बाजुला पावसाच्या पाण्यामुळे गटार साचली असल्याने जंतूसंसर्ग आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमंगरुळपीर हे शहर यवतमाळ-नांदेड, नागपूर-औरंगाबाद, पुसद-अकोला या महत्त्वाच्या मार्गावर आहे.प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बसस्थानक प्रशासनाने या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. बसस्थानकात प्रवेश करण्याच्या मार्गावर आणि इमारतीच्या मागील बाजूस मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसामुळे दरवर्षी गटार तयार होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम: मंगरुळपीर येथील बसस्थानक इमारतीच्या परिसराला घाणीचा विळखा बसला आहे. बसस्थानकाच्या पुढील आणि मागील बाजुला पावसाच्या पाण्यामुळे गटार साचली असल्याने जंतूसंसर्ग आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तथापि, बसस्थानक प्रशासन किंवा बसस्थानक प्रमुखांकडून हे गटार बुजविण्याची तसदी घेत नसल्याचे दिसत आहे.

मंगरुळपीर हे शहर वाशिम जिल्ह्यातून जाणाºया यवतमाळ-नांदेड, नागपूर-औरंगाबाद, पुसद-अकोला या महत्त्वाच्या मार्गावर आहे. साहजिकच या ठिकाणाहून औरंगाबाद, नागपूर, पुणे, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा यासह इतर ठिकाणी जाणाºया राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)च्या अनेक बसफेºया मंगरुळपीरमार्गेच धावतात. त्यामुळेच येथील बसस्थानकावर उपरोक्त गावांकडे जाणारे शेकडो प्रवासी येथील बसस्थानकावर प्रतिक्षा करीत असतात. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बसस्थानक प्रशासनाने या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे; परंतु त्याची फारसी काळजी घेतली जात नाही. तसे काही दिवसांपूर्वी बसस्थानकावर नव्याने पंखे बसविण्यासह इतर कामे करण्यात आली; परंतु साफसफाईबाबत येथे प्रचंड उदासीनता दिसत आहे. सुसज्ज अशा बसस्थानक इमारत परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. बसस्थानकात प्रवेश करण्याच्या मार्गावर आणि इमारतीच्या मागील बाजूस मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसामुळे दरवर्षी गटार तयार होते. सतत पाऊस पडल्यानंतर या गटारातील साचलेल्या पाण्याला दुर्गंधी सुटते. तसेच जंतूही वातावरणात पसरतात. त्यामुळे येथे बसची प्रतिक्षा करीत असलेल्या प्रवाशांच्या आरोग्याला त्यापासून धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन बसस्थानक वा आगार प्रमुखांनी ही गटारे तात्काळ बुजवावी, अशी मागणी केली जात आहे.  

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर