शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

‘जलयुक्त’चा निधी थांबल्यास ३३६ कामे होणार प्रभावित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 15:00 IST

जलयुक्त शिवारचा शिल्लक निधी खर्च न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास संबंधित सर्व कामे प्रभावित होणार असल्याचे संकेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये एकंदरित २५२ गावांमध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या जलयुक्त शिवारच्या २५८६ कामांपैकी २२५० कामे पूर्ण झाली; तर उर्वरित ३३६ कामे प्रलंबित आहेत. शिल्लक असलेल्या ६ कोटींच्या निधीतून ती पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने मुख्य सचिवांची परवानगी मागितली; मात्र ती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. अशात जलयुक्त शिवारचा शिल्लक निधी खर्च न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास संबंधित सर्व कामे प्रभावित होणार असल्याचे संकेत आहेत.२०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात ४१२, रिसोडमध्ये ४०५, मालेगावात ५७०, मंगरूळपीरपिरात ४०८, मानोरा १३० आणि कारंजा तालुक्यात ३२५ अशी एकूण २२५० कामे पूर्ण झाली आहेत. त्याची टक्केवारी ९२.९ आहे. या कामांवर २५ कोटींपेक्षा अधिक निधी खर्च झाला असून ६ कोटींचा निधी शिल्लक आहे. त्यातून प्रलंबित असलेली ३३६ कामे पूर्ण होऊ शकतात; मात्र नव्या वर्षात मुख्य सचिवांची अद्यापपर्यंत परवानगी मिळाली नसून राज्यशासनाने जलयुक्तचा सर्व निधी थांबविल्याची माहिती आहे. असे झाल्यास कामे प्रभावित होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. जलयुक्त शिवारच्या प्रलंबित असलेल्या ३३६ कामांसाठी ६ कोटींचा निधी शिल्लक आहे; मात्र तो खर्च करण्यासंबंधी मुख्य सचिवांची परवानगी अद्याप मिळालेली नाही. राज्यशासनाकडून निधी थांबविल्यासंदर्भात कुठलेही निर्देश प्राप्त नाहीत.- एस.एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा सदस्य सचिव, जलयुक्त शिवार अभियान, वाशिम

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार