शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मानवी अवयव दान; आरोग्य विभागामार्फत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:39 IST

शरिरातील एखादा अवयव निकामी झाला तर दुसºया अवयवाशिवाय पर्याय नसतो. दुसरा अवयवही मानवाकडूनच मिळणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देआता नेत्रदानाबरोबरच इतर अवयवही दान करा आणि दुसºयांना जीवनदान द्या, असा नारा दिला जात आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता मरणोत्तर अवयव दानाच्या संख्येत वाढ होत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्यूनंतर साधारणत: ४८ तास मानवी अवयव जीवंत राहु शकतात.

वाशिम - मानवी अवयव प्रत्यारोपणासंदर्भात आरोग्य विभाग व स्वयंसेवी संघटनेच्यावतीने जनजागृती केली जात आहे. मृत्यूनंतरही जग पाहा, असे नेत्रदानाबाबत म्हटले जाते. आता नेत्रदानाबरोबरच इतर अवयवही दान करा आणि दुसºयांना जीवनदान द्या, असा नारा दिला जात आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता मरणोत्तर अवयव दानाच्या संख्येत वाढ होत असल्याचे आशादायी चित्र आहे. 

जन्माला आलेल्या मानवाला मृत्यु हा अटळ आहे. धकाधकीच्या युगात मानवाला विविध आजार जडत आहेत. शरिरातील एखादा अवयव निकामी झाला तर दुसºया अवयवाशिवाय पर्याय नसतो. दुसरा अवयवही मानवाकडूनच मिळणे गरजेचे आहे.  यातूनच ‘अवयव दान’ या संकल्पनेचा जन्म झाला. मृत्यूनंतर साधारणत: ४८ तास मानवी अवयव जीवंत राहु शकतात. या ४८ तासात नेत्र, मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस मृतक मनुष्याच्या शरीरातून काढण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. हेच अवयव गरजू व्यक्तींना जीवनदायी ठरतात. मृत्यूनंतरही शरिरातील अवयव इतरांना जीवनदान देऊ शकतात, याबाबत सेवाभावी संस्था आणि आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती केली जात आहे. साधारणत: सात-आठ वर्षांपूर्वी साधारणत: नेत्रदान करण्यावरच भर दिला जायचा. आता नेत्राबरोबरच मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस यासह महत्त्वाचे अवयव दान करण्याबाबतच्या जनजागृतीवर भर दिला जात आहे. अवयव दान मोहिमेत ‘व्यावसायिकता’ शिरू नये म्हणून केंद्र शासनाने १९९४ मध्ये एक अधिनियम पारीत केला आहे. मानवी अवयवांची व्यावसायिक विक्री होऊ नये याकरिता केंद्र शासनाने ‘मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम, १९९४’ लागू केला आहे.  राज्यात १८८ नोंदणीकृत केंद्रे असून, त्यापैकी एक अवयव प्रत्यारोपणासाठी १५३ व एकापेक्षा जास्त अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी ३५ केंद्रे आहेत. नेत्रदान, नेत्रपेढी व बुब्बुळ प्रत्यारोपणासाठी २७८ केंद्रे आहेत. राज्यात मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, नेत्रपटल आदी अवयवांच्या यशस्वी प्रत्यारोपणातून अनेकांना जीवनदान मिळाले आहे. राज्यातील मृत्रपिंड प्रत्यारोपणाची आकडेवारी विचारात घेतली तर २०१५-१६ मध्ये ९७, २०१६-१७ मध्ये २०४ आणि २०१७-१८ मध्ये २३० मृत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. यकृत प्रत्यारोपणाच्या आकडेवारीनुसार, २०१५-१६ मध्ये ४१, २०१६-१७ मध्ये ११७ आणि  २०१७-१८ मध्ये १३४ यकृतांचे प्रत्यारोपण झाले. २०१५-१६ मध्ये ५ हृदय प्रत्यारोपण, २०१६-१७ मध्ये ३५ आणि २०१७-१८ मध्ये ५७ हृदय प्रत्यारोपण झाले. सर्वाधिक प्रत्यारोपण नेत्रपटल या अवयवाचे आहे.  २०१५-१६ मध्ये ३२३०, २०१६-१७ मध्ये २९८९ आणि २०१७-१८ मध्ये ३२०० नेत्रपटलाचे प्रत्यारोपण झाले.

मानवी अवयव दानासंदर्भात आरोग्य विभाग व स्वयंसेवी संघटनेच्यावतीने जनजागृती केली जात आहे. याचे सकारात्मक परिणाम म्हणून अवयव दान केले जात आहे. यामुळे गरजूंना जीवनदान मिळत आहे.- डॉ.  अनिल कावरखे,  वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रूग्णालय, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमOrgan donationअवयव दान