शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मानवी अवयव दान; आरोग्य विभागामार्फत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:39 IST

शरिरातील एखादा अवयव निकामी झाला तर दुसºया अवयवाशिवाय पर्याय नसतो. दुसरा अवयवही मानवाकडूनच मिळणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देआता नेत्रदानाबरोबरच इतर अवयवही दान करा आणि दुसºयांना जीवनदान द्या, असा नारा दिला जात आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता मरणोत्तर अवयव दानाच्या संख्येत वाढ होत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्यूनंतर साधारणत: ४८ तास मानवी अवयव जीवंत राहु शकतात.

वाशिम - मानवी अवयव प्रत्यारोपणासंदर्भात आरोग्य विभाग व स्वयंसेवी संघटनेच्यावतीने जनजागृती केली जात आहे. मृत्यूनंतरही जग पाहा, असे नेत्रदानाबाबत म्हटले जाते. आता नेत्रदानाबरोबरच इतर अवयवही दान करा आणि दुसºयांना जीवनदान द्या, असा नारा दिला जात आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता मरणोत्तर अवयव दानाच्या संख्येत वाढ होत असल्याचे आशादायी चित्र आहे. 

जन्माला आलेल्या मानवाला मृत्यु हा अटळ आहे. धकाधकीच्या युगात मानवाला विविध आजार जडत आहेत. शरिरातील एखादा अवयव निकामी झाला तर दुसºया अवयवाशिवाय पर्याय नसतो. दुसरा अवयवही मानवाकडूनच मिळणे गरजेचे आहे.  यातूनच ‘अवयव दान’ या संकल्पनेचा जन्म झाला. मृत्यूनंतर साधारणत: ४८ तास मानवी अवयव जीवंत राहु शकतात. या ४८ तासात नेत्र, मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस मृतक मनुष्याच्या शरीरातून काढण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. हेच अवयव गरजू व्यक्तींना जीवनदायी ठरतात. मृत्यूनंतरही शरिरातील अवयव इतरांना जीवनदान देऊ शकतात, याबाबत सेवाभावी संस्था आणि आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती केली जात आहे. साधारणत: सात-आठ वर्षांपूर्वी साधारणत: नेत्रदान करण्यावरच भर दिला जायचा. आता नेत्राबरोबरच मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस यासह महत्त्वाचे अवयव दान करण्याबाबतच्या जनजागृतीवर भर दिला जात आहे. अवयव दान मोहिमेत ‘व्यावसायिकता’ शिरू नये म्हणून केंद्र शासनाने १९९४ मध्ये एक अधिनियम पारीत केला आहे. मानवी अवयवांची व्यावसायिक विक्री होऊ नये याकरिता केंद्र शासनाने ‘मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम, १९९४’ लागू केला आहे.  राज्यात १८८ नोंदणीकृत केंद्रे असून, त्यापैकी एक अवयव प्रत्यारोपणासाठी १५३ व एकापेक्षा जास्त अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी ३५ केंद्रे आहेत. नेत्रदान, नेत्रपेढी व बुब्बुळ प्रत्यारोपणासाठी २७८ केंद्रे आहेत. राज्यात मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, नेत्रपटल आदी अवयवांच्या यशस्वी प्रत्यारोपणातून अनेकांना जीवनदान मिळाले आहे. राज्यातील मृत्रपिंड प्रत्यारोपणाची आकडेवारी विचारात घेतली तर २०१५-१६ मध्ये ९७, २०१६-१७ मध्ये २०४ आणि २०१७-१८ मध्ये २३० मृत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. यकृत प्रत्यारोपणाच्या आकडेवारीनुसार, २०१५-१६ मध्ये ४१, २०१६-१७ मध्ये ११७ आणि  २०१७-१८ मध्ये १३४ यकृतांचे प्रत्यारोपण झाले. २०१५-१६ मध्ये ५ हृदय प्रत्यारोपण, २०१६-१७ मध्ये ३५ आणि २०१७-१८ मध्ये ५७ हृदय प्रत्यारोपण झाले. सर्वाधिक प्रत्यारोपण नेत्रपटल या अवयवाचे आहे.  २०१५-१६ मध्ये ३२३०, २०१६-१७ मध्ये २९८९ आणि २०१७-१८ मध्ये ३२०० नेत्रपटलाचे प्रत्यारोपण झाले.

मानवी अवयव दानासंदर्भात आरोग्य विभाग व स्वयंसेवी संघटनेच्यावतीने जनजागृती केली जात आहे. याचे सकारात्मक परिणाम म्हणून अवयव दान केले जात आहे. यामुळे गरजूंना जीवनदान मिळत आहे.- डॉ.  अनिल कावरखे,  वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रूग्णालय, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमOrgan donationअवयव दान