शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मानवी अवयव दान; आरोग्य विभागामार्फत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:39 IST

शरिरातील एखादा अवयव निकामी झाला तर दुसºया अवयवाशिवाय पर्याय नसतो. दुसरा अवयवही मानवाकडूनच मिळणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देआता नेत्रदानाबरोबरच इतर अवयवही दान करा आणि दुसºयांना जीवनदान द्या, असा नारा दिला जात आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता मरणोत्तर अवयव दानाच्या संख्येत वाढ होत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्यूनंतर साधारणत: ४८ तास मानवी अवयव जीवंत राहु शकतात.

वाशिम - मानवी अवयव प्रत्यारोपणासंदर्भात आरोग्य विभाग व स्वयंसेवी संघटनेच्यावतीने जनजागृती केली जात आहे. मृत्यूनंतरही जग पाहा, असे नेत्रदानाबाबत म्हटले जाते. आता नेत्रदानाबरोबरच इतर अवयवही दान करा आणि दुसºयांना जीवनदान द्या, असा नारा दिला जात आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता मरणोत्तर अवयव दानाच्या संख्येत वाढ होत असल्याचे आशादायी चित्र आहे. 

जन्माला आलेल्या मानवाला मृत्यु हा अटळ आहे. धकाधकीच्या युगात मानवाला विविध आजार जडत आहेत. शरिरातील एखादा अवयव निकामी झाला तर दुसºया अवयवाशिवाय पर्याय नसतो. दुसरा अवयवही मानवाकडूनच मिळणे गरजेचे आहे.  यातूनच ‘अवयव दान’ या संकल्पनेचा जन्म झाला. मृत्यूनंतर साधारणत: ४८ तास मानवी अवयव जीवंत राहु शकतात. या ४८ तासात नेत्र, मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस मृतक मनुष्याच्या शरीरातून काढण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. हेच अवयव गरजू व्यक्तींना जीवनदायी ठरतात. मृत्यूनंतरही शरिरातील अवयव इतरांना जीवनदान देऊ शकतात, याबाबत सेवाभावी संस्था आणि आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती केली जात आहे. साधारणत: सात-आठ वर्षांपूर्वी साधारणत: नेत्रदान करण्यावरच भर दिला जायचा. आता नेत्राबरोबरच मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस यासह महत्त्वाचे अवयव दान करण्याबाबतच्या जनजागृतीवर भर दिला जात आहे. अवयव दान मोहिमेत ‘व्यावसायिकता’ शिरू नये म्हणून केंद्र शासनाने १९९४ मध्ये एक अधिनियम पारीत केला आहे. मानवी अवयवांची व्यावसायिक विक्री होऊ नये याकरिता केंद्र शासनाने ‘मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम, १९९४’ लागू केला आहे.  राज्यात १८८ नोंदणीकृत केंद्रे असून, त्यापैकी एक अवयव प्रत्यारोपणासाठी १५३ व एकापेक्षा जास्त अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी ३५ केंद्रे आहेत. नेत्रदान, नेत्रपेढी व बुब्बुळ प्रत्यारोपणासाठी २७८ केंद्रे आहेत. राज्यात मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, नेत्रपटल आदी अवयवांच्या यशस्वी प्रत्यारोपणातून अनेकांना जीवनदान मिळाले आहे. राज्यातील मृत्रपिंड प्रत्यारोपणाची आकडेवारी विचारात घेतली तर २०१५-१६ मध्ये ९७, २०१६-१७ मध्ये २०४ आणि २०१७-१८ मध्ये २३० मृत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. यकृत प्रत्यारोपणाच्या आकडेवारीनुसार, २०१५-१६ मध्ये ४१, २०१६-१७ मध्ये ११७ आणि  २०१७-१८ मध्ये १३४ यकृतांचे प्रत्यारोपण झाले. २०१५-१६ मध्ये ५ हृदय प्रत्यारोपण, २०१६-१७ मध्ये ३५ आणि २०१७-१८ मध्ये ५७ हृदय प्रत्यारोपण झाले. सर्वाधिक प्रत्यारोपण नेत्रपटल या अवयवाचे आहे.  २०१५-१६ मध्ये ३२३०, २०१६-१७ मध्ये २९८९ आणि २०१७-१८ मध्ये ३२०० नेत्रपटलाचे प्रत्यारोपण झाले.

मानवी अवयव दानासंदर्भात आरोग्य विभाग व स्वयंसेवी संघटनेच्यावतीने जनजागृती केली जात आहे. याचे सकारात्मक परिणाम म्हणून अवयव दान केले जात आहे. यामुळे गरजूंना जीवनदान मिळत आहे.- डॉ.  अनिल कावरखे,  वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रूग्णालय, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमOrgan donationअवयव दान