शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शाळेची वेळ बदलण्यापूर्वीच मानव मिशनच्या बसचे वेळापत्रक बदलले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 18:04 IST

अनेक विद्यार्थीनींना शुक्रवार ६ मार्चपर्यंत खासगी वाहनाने खर्च करून प्रवास करावा लागला. 

ठळक मुद्दे कारंजा आगाराचा अजब कारभार विद्यार्थिनींचा आठवडाभर खासगी वाहनात प्रवास

लोकमत न्युज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील इंझोरीसह परिसरातील शालेय विद्यार्थीनींच्या प्रवासासाठी कारंजा आगारातून धावणाºया मानव मिशनच्या बसफेरीचे वेळापत्रक आठवडाभरापूर्वीच अचानक बदलले आहे. शाळेची वेळ बदलण्यापूर्वीच ही फेरी सकाळी धावत असल्याने या बसने शैक्षणिक प्रवास करणाºया अनेक विद्यार्थीनींना शुक्रवार ६ मार्चपर्यंत खासगी वाहनाने खर्च करून प्रवास करावा लागला. विद्यार्थीनींचा शालेय प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून मानव विकास मिशन अंतर्गत एसटीच्या बसफेºया सुरू करण्यात आल्या आहेत. मानोरा ते कारंजा मार्गावरील विविध गावांत शिक्षण घेणाºया विद्यार्थीनींसाठीही कारंजा आगारातून मानव मिशनची एक बस सोडण्यात येते. उन्हाळ्याच्या दिवसांत रखरखत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन शाळांची दुपारची वेळ बदलून सकाळच्या वेळेत शाळा भरविण्यात येते. त्यानुसार मानव मिशनच्या वेळेतही बदल केला जातो; परंतु शुक्रवार ६ मार्चपर्यंतही शाळांची वेळ बदलण्यात आली नसतानाही आठवडाभरापूर्वीपासूनच कारंजा आगारातून सोडण्यात येणारी मानव मिशनची बस दुपारऐवजी सकाळी धावत आहे. त्यामुळे विद्यार्थीनींना या बसचा कोणताही फायदा झाला नाही. त्यांना खर्च करून खासगी वाहनाने शाळेत जावे लागले. 

मानव मिशनच्या बसचे वेळापत्रक आठवडाभरापूर्वी बदलल्याचा आरोप चुकीचा आहे. एका शाळेकडून मागणी झाल्यानंतरही आम्ही ३ फेब्रुवारीपर्यंत पूर्वीच्याच वेळेत बसफेरी सोडत होतो. याबाबत शिक्षण विभागाचे अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर मात्र ३ फेब्रुवारीपासून सकाळी सुरू केली आहे.-मुकूंद न्हावकर, आगारप्रमुख, कारंजा