शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाशिम जिल्ह्यातील पाच मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा; नदी, नाल्यांना पूर आलाच पण  पिकांसह जमिनी खरडल्या

By दादाराव गायकवाड | Updated: September 12, 2022 15:55 IST

जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. त्यात कारंजा तालुक्यातील धनज बु ते कारंजा मार्गावरील झोडगा नदीला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास तीन तास ठप्प झाली होती.

वाशिम: पावसाने जिल्ह्यात पुन्हा धडाका सुरू केला आहे. रविवार ११ सप्टेंबर ते सोमवार १२ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात ३८.४० मि.मी पावसाची नोंद झाली असून, सहा महसूल मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून, नदी, नाल्यांनाही पूर आल्याने अनेक भागांत पिकांसह जमिनी खरडून गेल्या आहेत.

जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७८९.०० मि.मी. पाऊस अपेक्षीत असताना १२ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजेपर्यंतच ७९८.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात रविवार ११ सप्टेंबर ते सोमवार १२ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी ३८.४० मि.मी. पाऊस पडला. मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यात या २४ तासांत धो-धो पाऊस पडल्याने सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यात मंगरुळपीर तालुक्यातील पोटी, कवठळ, मानोरा तालुक्यातील इंझोरी आणि कारंजा तालुक्यातील धनज बु. आणि उंबर्डा बाजार महसूल मंडळाचा समावेश असून, अतिवृष्टीमुळे या मंडळात नदी. नाल्या काठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकांसह जमिनी खरडून गेल्या आहेत.इंझोरी मंडळात २४ तासांत १३५ मि.मी. पाऊसजिल्ह्यात रविवारी रात्रीपासून पावसाने धडाका सुरू केला. सोमवारीही पावसाचा धडाका सुरूच होता. या पावसामुळे इंझोरी महसूल मंडळात २४ तासांत १३५.०० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याशिवाय मंगरुळपीर तालुक्यातील पोटी मंडळात ८८.००. कवठळ मंडळात ७७.८०, कारंजा तालुक्यातील धनज बु. मंडळात ८१.३० आणि उंबर्डा बाजार महसूल मंडळात ७९.५० मि.मी. पावसाची नोंद झाली.हातातोंंडाशी आलेली पिके नेस्तनाबूदजिल्ह्यात रविवार सकाळ ते सोमवार सकाळपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ३८.४० मि.मी. पावसाची नोंद झाली असली तरी मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील बहुतांश मंडळात ५० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके नेस्तनाबूद झाली असून, या पीक नुकसानाची तातडीने पाहणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.धनज बु ते कारंजा रोडवरील वाहतूक ठप्पजिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. त्यात कारंजा तालुक्यातील धनज बु ते कारंजा मार्गावरील झोडगा नदीला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास तीन तास ठप्प झाली होती. सोमवारी दुपारपर्यंतही या नदीचा पूर ओसरला नव्हता. अडाण नदीचे पात्रही दुथडी भरून वाहत होते.

टॅग्स :floodपूर