शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

२१ मेपर्यंत उष्णतेची लाट!

By admin | Updated: May 16, 2016 01:20 IST

उन्हापासून काळजी घेण्याचे वाशिम जिल्हाधिका-यांचे आवाहन.

वाशिम : राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आली असून, जिल्ह्यातही या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. गत तीन ते चार दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर तापमानात वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रविवारी केले आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ मे २0१६ पयर्ंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर २२ ते ३१ मे २0१६ या कालावधीत उष्ण लहरी हळूहळू कमी होणार आहेत. उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सकाळी १0 ते सायंकाळी ५ या कालावधीत गरज नसताना उन्हात जाणे टाळावे. अत्यावश्यक असल्यास उन्हात जाताना डोक्याला दुपदरी पांढरा रूमाल बांधावा. अंगात शक्यतो काळे व भडक रंगाचे कपडे घालू नये, सैल पांढरे कपडे घालावे, पायात पादत्राणे घालून चालावे. उन्हामध्ये फिरताना थोड्या-थोड्या वेळाने सावलीमध्ये थांबावे. शेतमजूर व वीटभट्टीवर काम करणारे कामगार यांनी सकाळी व दुपारनंतर उशिरा अंगमेहनतीचे काम करावे, तसेच भरपूर पाणी प्यावे व अत्यावश्यक स्थितीत डोक्याला रूमाल बांधून काम करावे, असे आवाहन द्विवेदी यांनी केले. जनावरांना सावलीमध्ये बांधावे व त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.