शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल!

By admin | Updated: September 12, 2016 02:56 IST

वाशिम येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांचे प्रतिपादन.

वाशिम, दि. ११ : कापूस, सोयाबीन उत्पादकांसह सर्व शेतकर्‍यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीतही युती शासनाला जाग येत नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वाशिम येथील जिजाऊ सभागृहात रविवारला पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख, पक्ष निरीक्षक बसवराज पाटील, माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली ठाकूर, युवा सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, श्याम देवळे, डॉ. भगवानराव गोटे, माधवराव अंभोरे, सुनील पाटील, बाबाराव खडसे, पांडुरंग ठाकरे, माजी सभापती इम्रान कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन खडसे, संदीप दहात्रे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पटेल म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळामध्ये सोयाबीन, कापूस इत्यादी शेतमालाचे भाव हमीभावापेक्षा मार्केटचे भाव जास्त असायचे. यामुळे शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर सुधारला होता. युती शासनाच्या काळामध्ये हमी भावापेक्षा मार्केटच्या भावामध्ये प्रचंड घसरण झाली. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांनी सर्व पदाधिकार्‍यांना व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनेनुसार शासनाला जागे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. वेगळ्या विदर्भाबद्दल पटेल म्हणाले, की जनतेचा पाठिंबा असल्यास वेगळ्या विदर्भाला आमचा मुळीच विरोध राहणार नाही. वेगळ्या विदर्भामुळे जनतेचे हित होत असेल, तर नक्की आम्ही विदर्भावाद्यांच्या पाठीशी राहू. दरम्यान, इतर मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष संघटनेसाठी मतभेद विसरून काम करण्याचे आश्‍वासित केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी, तर आभार डॉ. भगवानराव गोटे यांनी केले. यावेळी सभागृहात हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.