शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल!

By admin | Updated: September 12, 2016 02:56 IST

वाशिम येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांचे प्रतिपादन.

वाशिम, दि. ११ : कापूस, सोयाबीन उत्पादकांसह सर्व शेतकर्‍यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीतही युती शासनाला जाग येत नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वाशिम येथील जिजाऊ सभागृहात रविवारला पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख, पक्ष निरीक्षक बसवराज पाटील, माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली ठाकूर, युवा सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, श्याम देवळे, डॉ. भगवानराव गोटे, माधवराव अंभोरे, सुनील पाटील, बाबाराव खडसे, पांडुरंग ठाकरे, माजी सभापती इम्रान कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन खडसे, संदीप दहात्रे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पटेल म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळामध्ये सोयाबीन, कापूस इत्यादी शेतमालाचे भाव हमीभावापेक्षा मार्केटचे भाव जास्त असायचे. यामुळे शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर सुधारला होता. युती शासनाच्या काळामध्ये हमी भावापेक्षा मार्केटच्या भावामध्ये प्रचंड घसरण झाली. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांनी सर्व पदाधिकार्‍यांना व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनेनुसार शासनाला जागे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. वेगळ्या विदर्भाबद्दल पटेल म्हणाले, की जनतेचा पाठिंबा असल्यास वेगळ्या विदर्भाला आमचा मुळीच विरोध राहणार नाही. वेगळ्या विदर्भामुळे जनतेचे हित होत असेल, तर नक्की आम्ही विदर्भावाद्यांच्या पाठीशी राहू. दरम्यान, इतर मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष संघटनेसाठी मतभेद विसरून काम करण्याचे आश्‍वासित केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी, तर आभार डॉ. भगवानराव गोटे यांनी केले. यावेळी सभागृहात हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.