शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

वादळी वा-यासह गारपीट

By admin | Updated: April 11, 2015 01:44 IST

संत्री, लिंबू, टरबूज, बिजवाई कांदे, आंबे भुईसपाट; लाखोंचे नुकसान.

मंगरुळपीर : तालुक्यातील वनोजासह शेलूबाजार परिसरात ९ एप्रिलच्या दुपारी ४ ते ६ दरम्यान जोरदार गारपिटीसह वादळी पाऊस बरसला. सुसाट वार्‍यामुळे वनोजा येथील शेतकर्‍यांच्या शेतातील संत्री, लिंबू, आंबा तसेच टरबूज आदी फळपिकांचे लाखोंचे नुकसान झाले. बर्‍याच ठिकाणी मोठे वृक्ष विजेच्या खांबांवर पडल्याने आठ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. वनोजासह शेलूबाजार येथे घरांवरील टिनपत्रे वादळी वार्‍यामुळे उडून गेली. ती गोळा करताना नागरिकांची तारांबळ उडाली होती. तालुक्यातील वनोजा, शेलूबाजार भागात गुरूवारी दुपारी ४ ते ६ वाजताच्या सुमारास गारपिटीसह वादळी पाऊस झाला. यामुळे वनोजा येथील कमलाबाई वसंतराव राऊत, वैशाली सुनील राऊत व सुनीता अरविंद वैराळे यांच्या २२ एकरांतील जवळपास १७00 झाडांवरील संत्री जमिनीवर आली, तर काही झाडे उन्मळून पडली. प्राथमिक माहितीनुसार, २५ ते ३0 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वनोजा येथील गजानन रामभाऊ राऊत यांच्या एक हेक्टरवरील लिंबाची संपूर्ण फळे झडून जमिनीवर सडा झाला. सोबतच सुशीलाबाई राजेंद्र राऊत यांच्या एक हेक्टर शेतातील टरबुजाचे नुकसान झाले. सोसाट्याच्या वार्‍यामुळे दोन घरांची पडझड झाली. तालुक्यातील तपोवन येथील शरद येवले यांच्या शेतातील बिजवाई कांदय़ाचे हजारोचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बदलेल्या वातावरणामुळे फळबागधारक शेतकरी चिंतेत सापडले होते. ९ एप्रिलच्या वादळी पावसामुळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले. हाताशी येणारी पिके गेल्याने शेतकरी पार खचून गेला आहे. खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे दुबार-तिबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यामुळे सोयाबीनसह सर्व पिकांच्या उत्पादनात मोठी घसरण आली. झालेले नुकसान रबी हंगामातून भरून काढण्याचे स्वप्न शेतकर्‍यांनी बाळगले; मात्र निसर्गाचा प्रकोप चालूच आहे. नापिकीची नुकसानभरपाई हाती पडली नसतानाच निर्सगाची बळीराजावर वक्रदृष्टी पडली. शिरपूर, रिसोड तालुक्यातील वसारी, दापुरी, केशवनगर, मसला, भरजहागिर व किनखडा येथेही वादळ वार्‍यासह पाऊस बरसला. यामध्ये आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मालेगाव व रिसोड तालुक्यात शुक्रवारी ३.३0 वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. सावरगाव जिरे परिसरात तुरळक गारांचा पाऊस झाला. वाशिम येथे १0 एप्रिलला रात्री ८ पासून जोरदार पावसास सुरुवात झाली.