शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून जिप्सम खत अप्राप्त

By admin | Updated: August 5, 2016 00:04 IST

चिबडलेल्या शेतीसाठी जिप्सम खताची अत्यावश्यकता; मात्र वाशिम जिल्ह्यात पुरवठाच नाही.

वाशिम, दि. ४ - शेतक-यांना सबसिडीवर देण्यात येणारे 'जिप्सम' खत वाशिम जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून आले नसल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात शेतकरी अनभिज्ञ असून, शेतकर्‍यांची मागणी नसल्याने खताचा पुरवठा नाही, असा दावा कृषी विभागाने केला.वाशिम जिल्ह्यात सरासरी चार लाख ९ हजार हेक्टर पेरणी क्षेत्र असून यावर्षी चार लाख तीन हजार ४६७ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक अर्थात दोन लाख ८७ हजार २२६ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून त्याखालोखाल तूरीचा पेरा ६३ हजार ५0१ हेक्टरवर झाला आहे. पाच हजार ८९७ हेक्टरवर एकूण तृणधान्याचा पेरा असून, ९१ हजार ४0५ हेक्टरवर एकूण कडधान्याचा पेरा आहे. १८ हजार ६३0 हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. जुलै महिन्यात संततधार पाऊस झाल्याने हलक्या प्रतीच्या अनेक जमिनी चिबडल्या. ऑगस्ट महिन्यातही दमदार पाऊस असल्याने मानोरा, कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरुळपीर तालुक्यात शेतीचा बराचसा भाग चिबडून गेला आहे. त्यामुळे तूर, क पाशी, सोयाबीन आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. चिबडलेल्या शेतीसाठी जिप्सम खताची अत्यावश्यकता असते, असा प्रगतशील शे तकरी व कृषी तज्ज्ञांचा दावा आहे. मानोरा तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी जिप्सम ख ताबाबत कृषी विभागाकडे विचारणा केली असता, शासनाकडून जिप्सम खताचा पुरवठा झालाच नसल्याची माहिती समोर आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात विचारणा केली असता, गत दोन वर्षांपासून शासनाकडून जिप्सम खताचा पुरवठा बंद असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. शेतकर्‍यांची मागणी नसल्याने हा पुरवठा बंद असल्याचा दावा करण्यात आला.असा आहे जिप्सम खताचा फायदा..1. क्षारयुक्त जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सममुळे सुटे होतात. त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारण्याचा मदत होते. परिणामी, जमिनीची सुपीकता वाढते. जमीन भुसभुशी त होते. जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.2. जमिनीची धूप कमी होते. तसेच पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सममुळे कमी होतात, असा दावा कृषी तज्ज्ञांनी केला. पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही तसेच जिप्सममुळे िपकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते. पिकांना आवश्यक असलेला गंधक जिप्सममुळे मिळतो. 3. जिप्सममुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात. सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. जिप्सममुळे वातावरणातील जास्त तापमान पिके सहन करू शकतात.