कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पंदेकृवि, अकोलाच्या अखिल भारतीय लिंबूवर्गीय फळ संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. दिनेश पैठणकर आणि कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या शास्त्रज्ञ निवृत्ती पाटील उपस्थित होते. डॉ. काळे यांनी संत्रा पिकातील फळ काढणीनंतरचे योग्य व्यवस्थापन करून अधिक उत्पन्न घेण्याचे आवाहन केले. तांत्रिक मार्गदर्शनात डॉ. दिनेश पैठणकर यांनी मृग बहारातील फळ काढणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करून, बागेची छाटणी करणे व सल काढणे, ओलीत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर ते जमिनीचा प्रकार बघून बाग ताणावर सोडेपर्यंत संपूर्ण विषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले. निवृत्ती पाटील यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यातील जमिनीची मशागत, माती परीक्षण, ओलीत व्यवस्थापनाच्या पद्धती, नवीन फळबाग लागवडीसाठी लेआऊट व खड्डे घेणे इत्यादीविषयी सविस्तरपणे माहिती दिली. सोबतच अनपेक्षितपणे नको असलेली फुलाची गळ करण्यासाठीच्या उपाययोजना विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण बावस्कर यांनी केले.
मृग बहारानंतर संत्रा बाग नियोजनाबाबत वेबिनारद्वारे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST