शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

रांगडा कांद्याच्या शास्त्रोक्त लागवडीबाबत मार्गदर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:26 IST

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुविदे फाउंडेशनचे विश्वस्त संजय उकळकर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषिविद्यातज्ज्ञ निवृत्ती पाटील उपस्थित होते. तांत्रिक मार्गदर्शनात ...

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुविदे फाउंडेशनचे विश्वस्त संजय उकळकर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषिविद्यातज्ज्ञ निवृत्ती पाटील उपस्थित होते.

तांत्रिक मार्गदर्शनात निवृत्ती पाटील यांनी, कांदा हे भारतीय आहारातील महत्त्वाचे पीक असून फळे व भाजीपाला पिकांमध्ये सर्वात जास्त परदेशी चलन देणारे पीक असल्याचे स्पष्ट केले; परंतु इतर देशांच्या तुलनेत भारताची उत्पादकता खूप कमी असतानाच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचीही उत्पादकता कमी असल्याचे सांगतानाच यामागील महत्त्वाची कारणे व संभाव्य उपायांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संजय उकळकर यांनी शेतकऱ्यांनी बहुपीक पद्धतीचा अवलंब करून आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करावी व त्यादृष्टीने अधिक बाजारभाव व जास्त नफा मिळविण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने तिन्ही हंगामात कांदा उत्पादन घेण्याचे आवाहन केले.

--------------

शास्त्रोक्त लागवडीविषयक मार्गदर्शन

कृषिविद्यातज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी खरीप व रांगडा हंगामातील कांदा लागवडीतील बारकावे विशद करताना योग्य जमिनीची निवड, योग्य व शिफारशीत वाणांचा वापर, बीजप्रक्रिया व रोपवाटिका व्यवस्थापन, अन्नद्रव्य व ओळीत व्यवस्थापन आणि कीडरोग व्यवस्थापनाविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. कांदा रोपवाटिका यशस्वी झाली म्हणजे निम्मी लढाई जिंकली असे समजले जाते. त्यामुळे उत्तम निचऱ्याच्या जमिनीत सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य मात्रेत वापर करून एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनाची जोड देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

---------------