शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वांग्याचे दर घसरल्याने उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 14:21 IST

पार्डी ताड: रखरखत्या उन्हात पाण्याचा काटकसरीने वापर करून राबराब राबत पिकवलेली वांगी आता फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्दे मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड शिवारातही या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. परंतु गेल्या दीड महिन्यापासून वांग्याचे दर मोठ्या प्रमाणात घटले.त्यातच १५ दिवसांपासून लग्नसराईसुद्धा बंद झाल्याने वांग्याची मागणीही घटली आहे.

पार्डी ताड: रखरखत्या उन्हात पाण्याचा काटकसरीने वापर करून राबराब राबत पिकवलेली वांगी आता फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या फळभाजीला बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांना वांग्यांची तोडणीही करणे पुरेनासे झाले आहे. पार्डी ताड परिसरात अनेक वांगी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. भाजीपाला वर्गीय पिकांत मागील काही वर्षांपासून बारमाही उत्पादन मिळणारे आणि सर्वाधिक मागणी असणाऱ्या वांग्याच्या पिकाची गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. या पिकांवर मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. वरचेवर पाणी आणि खते देण्यासह तीन वेळा फवारणी केल्याशिवाय झाडांना फळधारणाच होत नाही. तथापि, या फळभाजीचा उठाव मोठा असल्याने सिंचन सुविधा असलेले शेतकरी या पिकाचा आधार घेत असतात. मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड शिवारातही या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी वांग्याची लागवड केली आहे; परंतु गेल्या दीड महिन्यापासून वांग्याचे दर मोठ्या प्रमाणात घटले. त्यातच १५ दिवसांपासून लग्नसराईसुद्धा बंद झाल्याने वांग्याची मागणीही घटली आहे. बाजारात १० रुपये प्रति किलोदराने वांगी मिळू लागली असली तरी, ग्राहकच नसल्याने विके्र ते या मालाची मोजकीच उचल करीत आहेत. त्यामुळे लिलावातही शेतकऱ्यां च्या वांग्यांना मागणी मिळेनासी झाली असून, शेतकऱ्यांना आता शेतामधील वांग्यांच्या तोडणीवर खर्च करणेही पुरणारे नसल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर