शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे वाढली भुजल पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:04 IST

भुजल पातळीत गत पाच वर्षातील सरासरीनुसार यंदा १.१९ मीटरची वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सप्टेंबरच्या अखेरीस आलेल्या पावसामुळे भुजल पातळीत १.१९ मिटरने वाढली आहे. त्यात आॅक्टोबरच्या अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला आलेल्या पावसामुळे भुजल पातळीला अधिकच आधार झाला असून , यंदा पाणी समस्येची तीव्रता कमी होण्यासह सिंचनाची समस्याही मिटल्याचे दिसत आहे.वाशिम जिल्ह्यात सरासरी ७९८.७० मि.मी. पाऊस पडतो. गेल्या काही वर्षांपासून मात्र, पावसाची अनियमितता वाढल्याने पावसाची सरासरी कमी होऊन त्याचा भुजल पातळीवर भीषण परिणाम झाला आहे. भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून ७९ सर्वेक्षण विहिरींचे करून तयार केलेल्या अहवालावरूनच हे स्पष्ट होते. या संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार गत पाच वर्षांतील आॅक्टोबर महिन्याच्या अखेरची भुजल पातळी ही २.६१ मीटर असून, यंदाची अर्थात आॅक्टोबर २०१९ ची भुजल पातळी ही १.४२ मिटर असल्याचे दिसून आले. अर्थात यामुळेच जिल्ह्यातील भुजल पातळीत गत पाच वर्षातील सरासरीनुसार यंदा १.१९ मीटरची वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.गतवर्षी अपुऱ्या पावसानंतर जिल्ह्यात सिंचनासाठी वारेमाप उपसा झाल्याने भुजल पातळी जवळपास सव्वा मिटरने खालावली होती. त्यातच यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबर संपेपर्यंतही पावसाची सरासरी ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे यंदा भुजल पातळीची स्थिती चिंताजनक होती. तथापि, सप्टेंबरच्या अखेरनंतर परतीचा पाऊस चांगला कोसळला, तर आॅक्टोबर महिन्याच्या मध्यंतरानंतर अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठाण मांडल्याने भुजल पातळीला मोठा आधार मिळाला असून, आॅक्टोबर महिन्यातच भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून ७९ सर्वेक्षण विहिरींचे सर्वेक्षण केल्यानंतर भुजल पातळीत १.१९ मिटरने वाढ झाल्याचे आढळून आले. यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचन करणे सोपे होणार आहे. तथापि, पावसानंतर तात्काळ झालेल्या सर्वेक्षणातील ही वाढ असून, डिसेंबरनंतरही पातळी कमी होणार आहे. डिसेंबरनंतर करण्यात येणाºया सर्वेक्षणातील भुजल पातळीवरूनच जिल्ह्यातील भुजल पातळीची तीव्रता स्पष्ट होणार आहे. मंगरुळपीरमधील स्थिती सर्वात उत्तमजिल्ह्यात यंदा प्रत्यक्ष पावसाळ्याचे दिवस संपल्यानंतर कोसळलेल्या पावसामुळेच भुजल पातळीला मोठा आधार झाला असला तरी, त्यात सर्वाधिक वाढ ही कारंजा तालुक्यात दिसून येत आहे. या तालुक्यात ११ सर्वेक्षण विहिरींच्या तपासणीनुसार गत पाच वर्षांतील भुजल पातळी ३.४० असताना यंदाची भुजल पातळी ही १.६७ मीटर अर्थात गत पाच वर्षाच्या सरासरीच्या दुप्पट असल्याचे स्पष्ट झाले. या सरासरीचा विचार करता कारंजा तालुक्यात भुजल पातळीत १.७३ मीटरने वाढल्याचे स्पष्ट होत आहे. त्या खालोखाल मंगरुळपीर तालुक्याची भुजल पातळी १.३० मीटरने वाढली आहे. मानोरा तालुक्यात मात्र यंदाची भुजल पातळी १.९२ मीटर असतानाही गत पाच वर्षाच्या तुलनेत या तालुक्यातील भुजल पातळी केवळ ०.९८ मीटरने वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिम