शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अवकाळी पावसामुळे वाढली भुजल पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:04 IST

भुजल पातळीत गत पाच वर्षातील सरासरीनुसार यंदा १.१९ मीटरची वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सप्टेंबरच्या अखेरीस आलेल्या पावसामुळे भुजल पातळीत १.१९ मिटरने वाढली आहे. त्यात आॅक्टोबरच्या अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला आलेल्या पावसामुळे भुजल पातळीला अधिकच आधार झाला असून , यंदा पाणी समस्येची तीव्रता कमी होण्यासह सिंचनाची समस्याही मिटल्याचे दिसत आहे.वाशिम जिल्ह्यात सरासरी ७९८.७० मि.मी. पाऊस पडतो. गेल्या काही वर्षांपासून मात्र, पावसाची अनियमितता वाढल्याने पावसाची सरासरी कमी होऊन त्याचा भुजल पातळीवर भीषण परिणाम झाला आहे. भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून ७९ सर्वेक्षण विहिरींचे करून तयार केलेल्या अहवालावरूनच हे स्पष्ट होते. या संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार गत पाच वर्षांतील आॅक्टोबर महिन्याच्या अखेरची भुजल पातळी ही २.६१ मीटर असून, यंदाची अर्थात आॅक्टोबर २०१९ ची भुजल पातळी ही १.४२ मिटर असल्याचे दिसून आले. अर्थात यामुळेच जिल्ह्यातील भुजल पातळीत गत पाच वर्षातील सरासरीनुसार यंदा १.१९ मीटरची वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.गतवर्षी अपुऱ्या पावसानंतर जिल्ह्यात सिंचनासाठी वारेमाप उपसा झाल्याने भुजल पातळी जवळपास सव्वा मिटरने खालावली होती. त्यातच यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबर संपेपर्यंतही पावसाची सरासरी ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे यंदा भुजल पातळीची स्थिती चिंताजनक होती. तथापि, सप्टेंबरच्या अखेरनंतर परतीचा पाऊस चांगला कोसळला, तर आॅक्टोबर महिन्याच्या मध्यंतरानंतर अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठाण मांडल्याने भुजल पातळीला मोठा आधार मिळाला असून, आॅक्टोबर महिन्यातच भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून ७९ सर्वेक्षण विहिरींचे सर्वेक्षण केल्यानंतर भुजल पातळीत १.१९ मिटरने वाढ झाल्याचे आढळून आले. यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचन करणे सोपे होणार आहे. तथापि, पावसानंतर तात्काळ झालेल्या सर्वेक्षणातील ही वाढ असून, डिसेंबरनंतरही पातळी कमी होणार आहे. डिसेंबरनंतर करण्यात येणाºया सर्वेक्षणातील भुजल पातळीवरूनच जिल्ह्यातील भुजल पातळीची तीव्रता स्पष्ट होणार आहे. मंगरुळपीरमधील स्थिती सर्वात उत्तमजिल्ह्यात यंदा प्रत्यक्ष पावसाळ्याचे दिवस संपल्यानंतर कोसळलेल्या पावसामुळेच भुजल पातळीला मोठा आधार झाला असला तरी, त्यात सर्वाधिक वाढ ही कारंजा तालुक्यात दिसून येत आहे. या तालुक्यात ११ सर्वेक्षण विहिरींच्या तपासणीनुसार गत पाच वर्षांतील भुजल पातळी ३.४० असताना यंदाची भुजल पातळी ही १.६७ मीटर अर्थात गत पाच वर्षाच्या सरासरीच्या दुप्पट असल्याचे स्पष्ट झाले. या सरासरीचा विचार करता कारंजा तालुक्यात भुजल पातळीत १.७३ मीटरने वाढल्याचे स्पष्ट होत आहे. त्या खालोखाल मंगरुळपीर तालुक्याची भुजल पातळी १.३० मीटरने वाढली आहे. मानोरा तालुक्यात मात्र यंदाची भुजल पातळी १.९२ मीटर असतानाही गत पाच वर्षाच्या तुलनेत या तालुक्यातील भुजल पातळी केवळ ०.९८ मीटरने वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिम