शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

भूगर्भातील जलस्तर घटला!

By admin | Updated: November 29, 2014 23:44 IST

वाशिम जिल्ह्यात दुष्काळाची छाया होते आहे गडद : जलसाठय़ाची स्थितीही विदारक.

संतोष मुंढे / वाशिमजिल्हा दूष्काळाच्या खाईत ढकलला गेल्याचे हंगामी व सुधारीत पिक पैसेवारीने स्पष्ट केले. त्यातच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस वाशिम जिल्ह्याच्या भूगर्भातील जलस्तर - १.२६ मिटरने घटल्याने जिल्ह्यात दूष्काळाची दाहकता तिव्र होण्यास सुरुवात झाली आहे.जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख हेक्टरवरील खरिप पिकाच्या हंगामात मुख्य व नगदी पिकाच्या उत्पादनात पूरती वाट लागली आहे. अत्यल्प झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांना नापिकीला सामोरे जावे लागण्याची पाळी आली. या नापीकीची तिव्रता हंगामी व सुधारीत अशा दोन्ही टप्प्यात पिक पैसेवारी ५0 पैशाच्या आत आल्याने जिल्हा दूष्काळाच्या खाईत असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. जिल्ह्यातील जवळपास १0३ जलसाठेही त्यांच्यातील जलसाठा पाहता भविष्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची बाब अधोरेखीत करीत आहेत. गत पाच वर्षाच्या जलस्तराचा आढावा घेता वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा मानोरा या सहाही तालुक्याच्या आढाव्यात 0.२८ मिटरने जलस्तरात वाढ झाल्याची नोंद असली तरी. गतवर्षीच्या तूलनेत मात्र यावर्षी नोव्हेंबरच्या अखेर जिल्ह्याच्या भूगर्भातील जलस्तर जवळपास १.२६ मिटरने घटल्याची नोंद झाली आहे. या घटत्या भूजलस्तरात सर्वाधिक १.६२ मिटरने रिसोड तालुक्यातील जलस्तर घटल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ वाशिम तालुक्यातील जलस्तर १.४६ मिटरने जलस्तर घटल्याची नोंद असून त्यानंतर मालेगाव १.१४, मानोरा १.0९ , मंगरुळपीर १.0५ तर कारंजा १.0२ भूजलपातळीत घट झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.*जिल्ह्यातील १६ लघू प्रकल्पांनी गाठला तळ जिल्ह्यातील १00 लघू प्रकल्पांपैकी १६ लघू प्रकल्पांनी तळ गाठल्याची माहिती आहे. या प्रकल्पांमध्ये १५ टक्कयांपेक्षा कमी जलसाठा असून यापैकी दोन लघू प्रकल्प कोरडेठण्ण पडल्याची स्थिती आहे. कोरडेठण्ण पडलेल्या लघू प्रकल्पात वाशिम तालुक्यातील सोनखास येथील लघू प्रकल्प तर मानोरा तालुक्यातील पिंप्री हनुमान येथील लघू प्रकल्पाचा समावेश आहे. मानोरा व कारंजा तालुक्यात जलसाठय़ांची स्थिती आत्ताच दयनीय आहे.* मध्यम व लघू प्रकल्पातही ४७.५0 टक्के जलसाठाभूगर्भातील जलस्तर घटता आहे. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील तीन मध्यम व १00 लघू प्रकल्पात मिळून केवळ ४७.५0 टक्केच जलसाठा असल्याने दूष्काळाच्या झळा किती तिव्र असतील याचा मागमोस येवू शकतो. वाशिम तालुक्यातील एकबूर्जी व मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पात अनुक्रमे ७१.६८ व ७0.३३ इतका जलसाठा दिसत असला तरी कारंजा तालुक्यातील अडाण या मध्यम प्रकल्पात केवळ २८.९५ टक्केच जलसाठा आजमितीला आहे. तालुकानिहाय विचार करता वाशिम तालुक्यातील २0 लघू प्रकल्पात ६0.२५ टक्के, मालेगाव तालुक्यातील २0 लघु प्रकल्पात ५२.९३ टक्के, रिसोड तालुक्यातील १३ लघू प्रकल्पात ५२.८४ टक्के, मंगरुळपीर तालुक्यातील १३ लघू प्रकल्पात ६१.0७ टक्के, मानोरा तालुक्यातील २३ लघू प्रकल्पात ४0.५८ टक्के तर कारंजा तालुक्यातील एकूण ११ लघू प्रकल्पात आजघडीला केवळ ३१.0३ टक्केच जलसाठा असल्याची नोंद लघू पाटबंधारेच्या दप्तरी आहे.