शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

पडताळणीभोवतीच फिरतेय ‘ग्रीन लिस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 02:01 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्हय़ातील केवळ ५५ शेतकर्‍यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, पडताळणीभोवतीच ‘ग्रीन लिस्ट’चे (मंजूर यादी) घोडे अडले आहे.

ठळक मुद्देकर्जमाफी योजना पहिल्या टप्प्यात केवळ ५५ शेतकर्‍यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्हय़ातील केवळ ५५ शेतकर्‍यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, पडताळणीभोवतीच ‘ग्रीन लिस्ट’चे (मंजूर यादी) घोडे अडले आहे.जून २0१७ मध्ये कर्जमाफीच्या मुद्यावरून विविध संघटना तसेच शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांची र्मयादा घालून कर्जमाफी योजनेची ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हय़ातील एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात १ लाख २७ हजार शेतकर्‍यांनीच अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले. पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात गावस्तरावर चावडी वाचनही घेण्यात आले. चावडी वाचनातून अचूक ठरणार्‍या अर्जांची पडताळणी व किरकोळ दुरुस्त्या केल्यानंतर सदर यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली. शासनस्तरावरही या यादीला चाळणी लावण्यात आली. दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी प्रशासनातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात ५0 शेतकर्‍यांची निवड केली होती. यापैकी ३३ शेतकर्‍यांना  कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानही केला होता. त्यानंतर पुन्हा यादीची पडताळणी केली असता, या ५0 पैकी काही शेतकरी अपात्र ठरले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘ग्रीन लिस्ट’ प्राप्त झाली. पडताळणीअंती ५५ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. त्यानंतर ‘ग्रीन लिस्ट’ची पडताळणी सुरू आहे, या सबबीखाली अद्यापही शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. जिल्हा ते राज्यस्तरावर विविध चाळण्यातून कर्जमाफीचे प्रस्ताव गेल्यानंतर आणि परत चावडी वाचनातून पडताळणी केल्यानंतरही आता ‘ग्रीन लिस्ट’ची पडताळणीच सुरू असल्याने कर्जमाफीच्या लाभाबाबत शेतकर्‍यांमधून संभ्रम व्यक्त होत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी यापूर्वीच करण्यात आली. ग्रीन लिस्टमधील शेतकर्‍यांच्या कागदपत्रे व बँक खात्यांची पुन्हा पडताळणी सुरूच आहे. ही पडताळणी कधी पूर्ण होणार, प्रत्यक्षात केव्हा लाभ मिळणार, ग्रीन लिस्टमध्ये किती शेतकर्‍यांचा समावेश आहे, याबाबत संबंधित यंत्रणा कमालीची गुप्तता पाळून असल्याचे दिसून येते. कर्जमुक्ती झाली नसल्याने थकबाकीदार शेतकर्‍यांना रब्बी हंगामात पीक कर्ज मिळू शकले नाही. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीbankबँक