शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

पडताळणीभोवतीच फिरतेय ‘ग्रीन लिस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 02:01 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्हय़ातील केवळ ५५ शेतकर्‍यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, पडताळणीभोवतीच ‘ग्रीन लिस्ट’चे (मंजूर यादी) घोडे अडले आहे.

ठळक मुद्देकर्जमाफी योजना पहिल्या टप्प्यात केवळ ५५ शेतकर्‍यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्हय़ातील केवळ ५५ शेतकर्‍यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, पडताळणीभोवतीच ‘ग्रीन लिस्ट’चे (मंजूर यादी) घोडे अडले आहे.जून २0१७ मध्ये कर्जमाफीच्या मुद्यावरून विविध संघटना तसेच शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांची र्मयादा घालून कर्जमाफी योजनेची ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हय़ातील एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात १ लाख २७ हजार शेतकर्‍यांनीच अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले. पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात गावस्तरावर चावडी वाचनही घेण्यात आले. चावडी वाचनातून अचूक ठरणार्‍या अर्जांची पडताळणी व किरकोळ दुरुस्त्या केल्यानंतर सदर यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली. शासनस्तरावरही या यादीला चाळणी लावण्यात आली. दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी प्रशासनातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात ५0 शेतकर्‍यांची निवड केली होती. यापैकी ३३ शेतकर्‍यांना  कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानही केला होता. त्यानंतर पुन्हा यादीची पडताळणी केली असता, या ५0 पैकी काही शेतकरी अपात्र ठरले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘ग्रीन लिस्ट’ प्राप्त झाली. पडताळणीअंती ५५ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. त्यानंतर ‘ग्रीन लिस्ट’ची पडताळणी सुरू आहे, या सबबीखाली अद्यापही शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. जिल्हा ते राज्यस्तरावर विविध चाळण्यातून कर्जमाफीचे प्रस्ताव गेल्यानंतर आणि परत चावडी वाचनातून पडताळणी केल्यानंतरही आता ‘ग्रीन लिस्ट’ची पडताळणीच सुरू असल्याने कर्जमाफीच्या लाभाबाबत शेतकर्‍यांमधून संभ्रम व्यक्त होत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी यापूर्वीच करण्यात आली. ग्रीन लिस्टमधील शेतकर्‍यांच्या कागदपत्रे व बँक खात्यांची पुन्हा पडताळणी सुरूच आहे. ही पडताळणी कधी पूर्ण होणार, प्रत्यक्षात केव्हा लाभ मिळणार, ग्रीन लिस्टमध्ये किती शेतकर्‍यांचा समावेश आहे, याबाबत संबंधित यंत्रणा कमालीची गुप्तता पाळून असल्याचे दिसून येते. कर्जमुक्ती झाली नसल्याने थकबाकीदार शेतकर्‍यांना रब्बी हंगामात पीक कर्ज मिळू शकले नाही. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीbankबँक