शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

नऊ महिने उलटूनही नेमले नाहीत ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’!

By admin | Updated: July 10, 2017 02:06 IST

वाशिम : महावितरणकडे तुलनेने अपुरे मनुष्यबळ असल्याने ग्रामीण भागात विजेसंदर्भातील समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महावितरणकडे तुलनेने अपुरे मनुष्यबळ असल्याने ग्रामीण भागात विजेसंदर्भातील समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. दरम्यान, वीज पुरवठ्यातील अडचणींवर मात करण्यासाठी ‘आयटीआय’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायती अंतर्गत प्रत्येक गावात ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमण्याचे शासनाचे निर्देश होते. मात्र, निर्णयास वर्ष उलटूनही जिल्ह्यातील अद्याप एकाही गावात यासंदर्भात कुठलीच कार्यवाही झालेली नाही.ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर विद्युतविषयक सेवा तातडीने उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे वीज पुरवठ्यासंदर्भातील प्रश्न लवकर निकाली निघावे, यासाठी महावितरणतर्फे पुरविण्यात येणाऱ्या काही सेवा ग्रामपंचायतींमार्फत उपलब्ध करून देण्यासाठी ‘एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक’ ही योजना राज्य शासनाने गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात अंमलात आणली. या अंतर्गत ग्रामपंचायतींनी ‘फ्रेंचाइसी’ तत्त्वावर काम करावे, यासाठी ऊर्जा विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दर्शविली. या योजनेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेकडो ‘आयटीआय’धारक बेरोजगार युवकांना कंत्राटी तत्त्वावर रोजगाराची संधी प्राप्त करून देण्याचा उद्देश बाळगण्यात आला होता. याअंतर्गत प्रति विद्युत ग्राहक ९ रुपयेप्रमाणे प्राप्त होणारे उत्पन्न अथवा माहेवारी तीन हजार रुपये, यात जी रक्कम अधिक असेल, ती प्रत्येक ग्राम विद्युत व्यवस्थापकास महावितरणकडून दिली जाणार आहे. मात्र, ४९१ पैकी तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ३२० ग्रामपंचायतींनी शासनाच्या या निर्देशाची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. परिणामी, जिल्ह्यातील ‘आयटीआय’धारक हजारो बेरोजगार विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत.