शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिने उलटूनही नेमले नाहीत ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’!

By admin | Updated: July 10, 2017 02:06 IST

वाशिम : महावितरणकडे तुलनेने अपुरे मनुष्यबळ असल्याने ग्रामीण भागात विजेसंदर्भातील समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महावितरणकडे तुलनेने अपुरे मनुष्यबळ असल्याने ग्रामीण भागात विजेसंदर्भातील समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. दरम्यान, वीज पुरवठ्यातील अडचणींवर मात करण्यासाठी ‘आयटीआय’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायती अंतर्गत प्रत्येक गावात ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमण्याचे शासनाचे निर्देश होते. मात्र, निर्णयास वर्ष उलटूनही जिल्ह्यातील अद्याप एकाही गावात यासंदर्भात कुठलीच कार्यवाही झालेली नाही.ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर विद्युतविषयक सेवा तातडीने उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे वीज पुरवठ्यासंदर्भातील प्रश्न लवकर निकाली निघावे, यासाठी महावितरणतर्फे पुरविण्यात येणाऱ्या काही सेवा ग्रामपंचायतींमार्फत उपलब्ध करून देण्यासाठी ‘एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक’ ही योजना राज्य शासनाने गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात अंमलात आणली. या अंतर्गत ग्रामपंचायतींनी ‘फ्रेंचाइसी’ तत्त्वावर काम करावे, यासाठी ऊर्जा विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दर्शविली. या योजनेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेकडो ‘आयटीआय’धारक बेरोजगार युवकांना कंत्राटी तत्त्वावर रोजगाराची संधी प्राप्त करून देण्याचा उद्देश बाळगण्यात आला होता. याअंतर्गत प्रति विद्युत ग्राहक ९ रुपयेप्रमाणे प्राप्त होणारे उत्पन्न अथवा माहेवारी तीन हजार रुपये, यात जी रक्कम अधिक असेल, ती प्रत्येक ग्राम विद्युत व्यवस्थापकास महावितरणकडून दिली जाणार आहे. मात्र, ४९१ पैकी तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ३२० ग्रामपंचायतींनी शासनाच्या या निर्देशाची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. परिणामी, जिल्ह्यातील ‘आयटीआय’धारक हजारो बेरोजगार विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत.