शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

ग्रामपंचायतींचा मासिक सभेला कोलदांडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 17:31 IST

वाशिम : जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये तेवढेच ग्रामसेवकांची नेमणूक असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत केवळ ३०३ ग्रामसेवकच कार्यरत असल्याने योजनांतर्गत कामांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम होत आहे.

ठळक मुद्देअनेक ग्रामपंचायतींमध्ये कायमस्वरूपी सचिव नसून एकाच ग्रामसचिवाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा कारभार सोपविला जातो.निधीचा योग्य विनियोग करण्याकामी आवश्यक ग्रामसेवकांची पदेच रिक्त असल्याने शासनाच्या मूळ उद्देशांना हरताळ फासला जात आहे.

वाशिम : जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये तेवढेच ग्रामसेवकांची नेमणूक असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत केवळ ३०३ ग्रामसेवकच कार्यरत असल्याने योजनांतर्गत कामांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम होत आहे. विशेष बाब म्हणजे अनेक ग्रामपंचायतींमध्ये नियमानुसार मासिक सभा होत नसल्याने ग्रामविकासाला ‘ब्रेक’ लागला आहे. योजनांतर्गत कामकाजाची गती देखील कमी असल्यामुळे अपेक्षित विकास साध्य होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कायमस्वरूपी सचिव नसून एकाच ग्रामसचिवाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा कारभार सोपविला जातो. परिणामी, प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात समसमान लक्ष पुरवून ग्रामीण विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये आजमितीस केवळ ३०३ ग्रामसेवक कार्यरत असून मोठ्या प्रमाणातील या अनुशेषामुळेच ग्रामविकासाचा बोजवारा उडत आहे. १४ व्या वित्त आयोगातून इतर कुठल्याही यंत्रणेच्या हस्तक्षेपाविना निधीचा विनियोग आणि योजनांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींकडे सोपविण्यात आले आहेत. मात्र, ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून निधीचा योग्य विनियोग करण्याकामी आवश्यक ग्रामसेवकांची पदेच रिक्त असल्याने शासनाच्या मूळ उद्देशांना हरताळ फासला जात आहे. याच कारणांमुळे अनेक ग्रामपंचातींच्या मासिक सभाच होत नसल्यानेही विकासाला बहुतांशी ‘ब्रेक’ लागल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत