शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ग्रामपंचायतींचा मासिक सभेला कोलदांडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 17:31 IST

वाशिम : जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये तेवढेच ग्रामसेवकांची नेमणूक असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत केवळ ३०३ ग्रामसेवकच कार्यरत असल्याने योजनांतर्गत कामांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम होत आहे.

ठळक मुद्देअनेक ग्रामपंचायतींमध्ये कायमस्वरूपी सचिव नसून एकाच ग्रामसचिवाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा कारभार सोपविला जातो.निधीचा योग्य विनियोग करण्याकामी आवश्यक ग्रामसेवकांची पदेच रिक्त असल्याने शासनाच्या मूळ उद्देशांना हरताळ फासला जात आहे.

वाशिम : जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये तेवढेच ग्रामसेवकांची नेमणूक असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत केवळ ३०३ ग्रामसेवकच कार्यरत असल्याने योजनांतर्गत कामांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम होत आहे. विशेष बाब म्हणजे अनेक ग्रामपंचायतींमध्ये नियमानुसार मासिक सभा होत नसल्याने ग्रामविकासाला ‘ब्रेक’ लागला आहे. योजनांतर्गत कामकाजाची गती देखील कमी असल्यामुळे अपेक्षित विकास साध्य होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कायमस्वरूपी सचिव नसून एकाच ग्रामसचिवाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा कारभार सोपविला जातो. परिणामी, प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात समसमान लक्ष पुरवून ग्रामीण विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये आजमितीस केवळ ३०३ ग्रामसेवक कार्यरत असून मोठ्या प्रमाणातील या अनुशेषामुळेच ग्रामविकासाचा बोजवारा उडत आहे. १४ व्या वित्त आयोगातून इतर कुठल्याही यंत्रणेच्या हस्तक्षेपाविना निधीचा विनियोग आणि योजनांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींकडे सोपविण्यात आले आहेत. मात्र, ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून निधीचा योग्य विनियोग करण्याकामी आवश्यक ग्रामसेवकांची पदेच रिक्त असल्याने शासनाच्या मूळ उद्देशांना हरताळ फासला जात आहे. याच कारणांमुळे अनेक ग्रामपंचातींच्या मासिक सभाच होत नसल्यानेही विकासाला बहुतांशी ‘ब्रेक’ लागल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत