शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांची लागणार कसोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 19:41 IST

वाशिम : यावर्षी पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २७३ ग्रा.पं. निवडणुकीचे मतदान होणार ७ आॅक्टोबरलायंदा प्रथमच होणार थेट जनतेतून सरपंचाची निवडदिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यावर्षी पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक होत आहे. ग्रामपंचायतची निवडणूक ही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालिम असून, सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी आपल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना ग्राम पंचायतच्या सत्तेत पोहोचविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारिप-बमसं या प्रमुख पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातही आपली शक्ती दाखविण्याच्या दृष्टिकोनातून भाजपाने व्यूहरचना आखली आहे. स्थानिक भाजपा पदाधिकारी तसेच भाजपा समर्थित कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर विविध आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या सत्तेत बसविण्यासाठी भाजपा नेत्यांचे कसब पणाला लागणार आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार विजयराव जाधव, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांच्यासह भाजपा पदाधिकाºयांना त्या दृष्टिने नियोजन करावे लागणार आहे. शिवसैनिक तथा समर्थकांच्या हाती अधिकाधिक ग्रामपंचायतची सत्ता सोपविण्यासाठी  पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, माजी आमदार प्रकाश डहाके, जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांना विशेष कसरत करावी लागणार आहे. पक्षांतर्गत गटबाजीचा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसैनिक तथा समर्थकांना बसणार नाही, याची दक्षता शिवसेनेच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. ग्रामीण भागातील सत्ता टिकविण्याबरोबरच जनाधार वाढविण्यासाठी काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक, माजी आमदार किसनराव गवळी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण भागात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच अधिकाधिक ग्रामपंचायतची सत्ता आपल्या समर्थकांच्या हाती सोपविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसलादेखील मैदानात उतरावे लागणार आहे. त्या दृष्टिने माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, राकाँ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीपराव जाधव, माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील, माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग ठाकरे यांच्यासह राकाँ नेतृत्त्वाची कसोटी लागणार आहे. वाशिम, कारंजा व मंगरूळपीर नगर परिषद निवडणुकीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत घवघवीत यश मिळविणाºया भारिप-बमसंलादेखील ग्रामपंचायत निवडणुकीत ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. समर्थक व कार्यकर्त्यांना विविध आघाडीच्या माध्यमातून अधिकाधिक ग्रामपंचायतींच्या सत्तेत बसविण्यासाठी जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजाणी यांना फिल्डिंग लावावी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील ‘राजकारण’ ढवळून निघत असून पक्षाच्या नेत्यांप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ डिसेंबर २०१८ मध्ये संपणार असून, ग्रामपंचायत निवडणुक ही रंगीत तालिम ठरत आहे. दरम्यान, १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरूवात झाली असून, २२ सप्टेंबर अंतिम मुदत आहे. १६ सप्टेंबरपर्यंत सरपंच पदासाठी पाच तर सदस्य पदासाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले.