शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांची लागणार कसोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 19:41 IST

वाशिम : यावर्षी पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २७३ ग्रा.पं. निवडणुकीचे मतदान होणार ७ आॅक्टोबरलायंदा प्रथमच होणार थेट जनतेतून सरपंचाची निवडदिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यावर्षी पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक होत आहे. ग्रामपंचायतची निवडणूक ही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालिम असून, सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी आपल्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना ग्राम पंचायतच्या सत्तेत पोहोचविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारिप-बमसं या प्रमुख पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातही आपली शक्ती दाखविण्याच्या दृष्टिकोनातून भाजपाने व्यूहरचना आखली आहे. स्थानिक भाजपा पदाधिकारी तसेच भाजपा समर्थित कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर विविध आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या सत्तेत बसविण्यासाठी भाजपा नेत्यांचे कसब पणाला लागणार आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार विजयराव जाधव, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांच्यासह भाजपा पदाधिकाºयांना त्या दृष्टिने नियोजन करावे लागणार आहे. शिवसैनिक तथा समर्थकांच्या हाती अधिकाधिक ग्रामपंचायतची सत्ता सोपविण्यासाठी  पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, माजी आमदार प्रकाश डहाके, जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांना विशेष कसरत करावी लागणार आहे. पक्षांतर्गत गटबाजीचा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसैनिक तथा समर्थकांना बसणार नाही, याची दक्षता शिवसेनेच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. ग्रामीण भागातील सत्ता टिकविण्याबरोबरच जनाधार वाढविण्यासाठी काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक, माजी आमदार किसनराव गवळी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण भागात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच अधिकाधिक ग्रामपंचायतची सत्ता आपल्या समर्थकांच्या हाती सोपविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसलादेखील मैदानात उतरावे लागणार आहे. त्या दृष्टिने माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, राकाँ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीपराव जाधव, माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील, माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग ठाकरे यांच्यासह राकाँ नेतृत्त्वाची कसोटी लागणार आहे. वाशिम, कारंजा व मंगरूळपीर नगर परिषद निवडणुकीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत घवघवीत यश मिळविणाºया भारिप-बमसंलादेखील ग्रामपंचायत निवडणुकीत ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. समर्थक व कार्यकर्त्यांना विविध आघाडीच्या माध्यमातून अधिकाधिक ग्रामपंचायतींच्या सत्तेत बसविण्यासाठी जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजाणी यांना फिल्डिंग लावावी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील ‘राजकारण’ ढवळून निघत असून पक्षाच्या नेत्यांप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ डिसेंबर २०१८ मध्ये संपणार असून, ग्रामपंचायत निवडणुक ही रंगीत तालिम ठरत आहे. दरम्यान, १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरूवात झाली असून, २२ सप्टेंबर अंतिम मुदत आहे. १६ सप्टेंबरपर्यंत सरपंच पदासाठी पाच तर सदस्य पदासाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले.