शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्वतंत्र सचिवाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत आक्रमक

By admin | Updated: May 27, 2017 19:43 IST

२५ मे रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांना निवेदन दिले.

रिसोड: तालुक्यातील नंधाना येथील ग्रामसचिव विनोद विर यांची तात्काळ बदली करुन नंधाना ग्रामपंचायतीला स्वतंत्र सचिव देण्याची मागणी  सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी २५ मे रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्याची दखल न घेतल्यास १ जुन २०१७ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करुन कामकाज बंद करण्याचा इशाराही दिला आहे. रिसोड  पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, नंधाना या गावासाठी कार्यरत ग्रामसेवक गावात नियमित येत नाहीत. सर्वसामान्य माणसाला दाखल्यावर सही आणण्यासाठी रिसोड येथेच जावे लागते. अनेक कामासाठी सचिवाची सही घेण्यासाठी रिसोडलाच जावे लागते. ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी  अनेक वेळा सचिवांना गावात प्रत्येक आठवड्यात एक दिवस येण्याची विनंती केली. परंतु त्याचा फायदा झाला नाही. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे, दरम्यान, ग्रामससचिव असूनही, जनतेला विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंचासह सर्व सदस्यांमध्ये रोेषाचे वातावरण असून, या संदर्भात संबंधितांना माहिती देऊनही काहीच फायदा होत नसल्याने त्यांनी रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून आपल्या समस्या त्यामध्ये मांडल्या आहेत. त्या समस्यांचा विचार  करून नंधाना येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांची बदली करण्यासह येथे स्वतंत्र ग्रामसेवक देण्याची मागणी त्या निवेदनातून करण्यात आल आहे.  याची दखल घेतली नाही, तर येत्या  १ जून रोजी  सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाला ताला ठोकून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही  देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रति ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेला देण्यात आल्या आहेत. निवेदन देतवेळी सरपंच सुधाकर बोरकर, उपसरपंच गजानन पवार, ग्रा.पं. सदस्य गजानन बोरकर, काशीराम उबाळे, सविता बोरकर, सरलाबाई चव्हाण,  संगिता बोरकर, रंजना उबाळे, रेखा उबाळे यांच्यासह गावातील पुरुष आदि उपस्थिती होते.