शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

होमगार्डच्या निष्काम सेवेलाही सरकारची कात्री

By admin | Updated: February 28, 2015 00:58 IST

गृहरक्षक दलाकडे सरकारची वक्रदृष्टी; साप्ताहीक परेड बंद.

वाशिम : निष्काम सेवा हे ब्रीद घेवून मागील अनेक वर्षापासून पोलिस कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करणार्‍या गृहरक्षक दलाची दर आठवड्याला होणारी साप्ताहीक परेड डिसेंबर २0१४ या महिन्याचा अखेरीस बंद करण्यात आली आहे. ही परेड बंद झाल्यामुळे राज्यातील ७0 हजार गृहरक्षक दलाच्या जवानावर मानधनापोटी होणारा सरकारचा खर्च वाचणार असून निष्काम सेवेलाही सरकारने काटकासरीची कात्री लावली आहे. दरम्यान, या परेडबाबत तीन महिने उलटून गेल्यावरही सरकारने कुठलाच निर्णय घेतला नसल्याने होमगार्डचे अस्तित्वच संपविण्याचा घाट घातला जात असल्याची शंका होमगार्ड मध्ये व्यक्त केली जात आहे. १९४७ साली झालेल्या जातीय दंगली शमविण्यासाठी समाजातील सेवाभावी नागरिकांनी पुढाकार घेतल्याने समाजामध्ये एकोपा व शांततेचे वातारण निर्माण झाले होते. त्यानंतर मोरारजी देसाई यांनी गृहरक्षक दलाची स्थापना केली होती. आज राज्यात ६९ हजार जवान कार्यरत आहेत. राज्यात कोठेही जातीय दंगलीची परिस्थिती असो की, केंद्र किंवा राज्याच्या निवडणुका असोत, सण, उत्सव किंवा अन्य कोणत्याही घटना असोत पोलिस यंत्रणेवर कमालीचा ताण पडतो. हा ताण कमी करण्याचे काम मग गृहरक्षक दलाचे जवान करतात. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावतात. त्यांना ही शिस्त लावली ती, दर आठवड्याला होणार्‍या साप्ताहीक परेडमधून. या परडमध्ये पोलिसांप्रमाणेच शस्त्र चालविणे, लाठीकाठी चालविणे, शारीरिक कसरती याशिवाय आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसा सामना करायचा याचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र हीच परेड आता युती सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येणार्‍या काळात हळु हळु गृहरक्षक दलच मोडीत काढण्याचा शासनाचा विचार असल्याचे या क्षेत्रातील एका तज्ज्ञ जाणकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर महिती दिली.